शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

सध्या बंड केल्याचा फायदा दिसत नाही, ‘जिधर हवा चली, उधर चलो’ असा माहोल: जावेद अख्तर

By नजीर शेख | Updated: January 5, 2024 11:57 IST

आता वर्किंग क्लासचे हिरो राहिले नाहीत तर श्रीमंत घरातील काही कामधंदा न करणारे हिरो चित्रपटात दिसू लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ‘ओपन मार्केट’च्या या काळात जीवन हे एक पॅकेज बनले आहे. चांगले, वाईट त्यामध्ये सर्व आहे. मात्र मी कोणते स्वीकारायचे आणि कसे जगायचे हे आपल्या हातात आहे. ‘किस हद तक मैं अपने लिए जी रहा हूँ’ याचा विचार करण्याची गरज आहे, असे वास्तव जेष्ठ गीतकार- लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी येथे आयोजित ९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित मुलाखतीत मांडले.चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी अख्तर यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी कधी मिश्किल टोलेबाजी करत तर कधी गंभीर विषयावर परखड भाष्य करत अख्तर यांनी अनेक बाबी उलगडून दाखविल्या.

अख्तर म्हणाले, पूर्वी देशात समाजवादी विचार होता, त्याचे प्रतिबिंब समाजात उमटत होते. आता ओपन मार्केट आणि ‘लिबरलायझेशन’चा काळ आहे. जगताना सापशिडीचा खेळ चालू आहे. या खेळामध्ये आपण आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी कोणत्या पातळीपर्यंत जगत आहोत, याचा विचार केला पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्याच्या चित्रपटातील हिरो सामाजिक इश्यूपासून दूर झाले आहेत, अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले की, आता वर्किंग क्लासचे हिरो राहिले नाहीत तर श्रीमंत घरातील काही कामधंदा न करणारे हिरो चित्रपटात दिसू लागले आहेत. पूर्वी हिरोचा लढा प्रस्थापितांच्या विरुद्ध असायचा. समाजात जे लोक नाखूश होते, तेही प्रस्थापितांच्या विरुद्ध होते. मात्र आता नाखूश राहण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. बंड केल्याचा काही फायदा होताना दिसत नाही. परंतु, सध्या ‘जिधर हवा चली, उधर चलो’ असा माहोल बनल्याचे सांगत सध्याच्या सामाजिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. संध्यायच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी नवीन शब्दांची भर घालते. मात्र, दिल्लीत ( संसदेत) शब्द वगळले जात आहेत. आमीर, वकील, शाह ही पर्शियन नावे आहेत. ही नावे काढून टाकण्याची हिंमत आहे का? काढून तर दाखवा असे सांगत  त्यांनी 'शाह' या शब्दावर जोर दिला.

तब आवाज कम होती हैमुलाखतीच्या वेळी काही ध्वनियंत्रणेमध्ये अडथळा येत होता. प्रेक्षकांकडून आवाज कमी येत असल्याची तक्रार झाली. यावर आपल्या मिस्किल स्वभावात जावेद अख्तर यांनी ‘मैं जब सच बोलता हूँ तो माईक की आवाज कम हो जाती है’ अशी टिप्पणी केली. त्यांच्या टिप्पणीला रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवत दाद दिली.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरAurangabadऔरंगाबादcinemaसिनेमा