शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

पतीने टिकली लावण्याचा हट्ट धरल्याने पत्नी आत्महत्येसाठी पोहचली रेल्वेस्थानकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 14:40 IST

प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याची कहाणी; दामिनी पथकाची मदत मिळाल्याने अनर्थ टळला

औरंगाबाद : टिकली लावण्याच्या आग्रहातून प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीत वादावादी झाली. दररोज तेल, साबण, शेंगदाणेसह इतर वस्तू संपल्यावर भांडण होत असे. अखेर कंटाळलेल्या पत्नीने आत्महत्या करण्यासाठी थेट रेल्वेस्थानक गाठले. त्याठिकाणी गेल्यावर दोन वर्षांच्या मुलीचे काय करावे, हा प्रश्न पडल्यानंतर ११२ नंबरला फोन करीत पोलिसांची मदत मागितली. दामिनी पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचत आत्महत्या करण्यास निघालेल्या महिलेचे मन वळविले व पती-पत्नींमध्ये समेट घडवून आणल्याची घटना शुक्रवारी घडली.

शहरातील एक युवक हैदराबाद येथे असतानाच त्याचे साऊथ इंडियन मुलीसोबत प्रेमसूत जुळले. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी हे संबंध तत्काळ स्वीकारत दोघांच्या लग्नास होकार दिला. मात्र, मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे दोघांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर या दाम्पत्यास एक मुलगी झाली. पती हा खासगी दवाखान्यात नोकरी करतो. पत्नी गुड फ्रायडेच्या निमित्ताने शुक्रवारी चर्चमध्ये जाण्यास निघाली होती. तेव्हा पतीने कपाळावर टिकली लावण्याचा आग्रह धरला. तेव्हा पत्नीने चर्चमधून आल्यानंतर टिकली लावते, असे पतीला सांगितले. त्यावरून दोघात टोकाचे भांडण झाले. त्याशिवाय या दाम्पत्यात दररोज किरणा संपल्यावरून वाद होत होते.

पती सतत तेल संपले, साबण संपली, शेंगदाणे संपले की, पत्नीसोबत भांडण करीत होता. या वादाला कंटाळून पत्नीने दोन वर्षांच्या मुलीला सोबत घेत आत्महत्या करण्यासाठी रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेस्थानकावर पोहचताच मुलीचे काय करावे, असा प्रश्न तिला पडला. तेव्हा महिलेने ११२ नंबरवर फोन करीत पोलिसांची मदत मागितली. नियंत्रण कक्षातून दामिनी पथकाला अलर्ट मिळाल्यानंतर पथकप्रमुख सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनात लता जाधव, मनीषा बनसोडे, आशा गायकवाड आणि निर्मला निंभोरे यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्या महिलेचे मनपरिवर्तन केल्यानंतर पतीला बोलावून दोघांत समझोता केला व मायलेकीला त्याच्या हवाली केले.

दोघांचा एकमेकांवर जीवदामिनी पथकाने गाडीत बसवून मायलेकींना रेल्वे स्थानकातून बाहेर आणले. त्यानंतर पतीला बोलावून घेतले. दोघांमध्ये समेट घडवला. किरकोळ कारणातून एवढ्या टोकाचे पाऊल उचलणे चुकीचे असल्याचे समजावून सांगितले. यावर दोघांनीही एकमेकांवर जीव असल्याचे स्पष्ट करीत मतभेद मिटवून आनंदाने तिघे घरी निघून गेले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस