शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

प्रेमविवाहात पतीचा त्रास वाढला; फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:03 IST

१८ ऑक्टोबर रोजीच मारले, २७ रोजी सापडला मृतदेह, त्यानंतर गुन्हे शाखेने केला खुनाचा उलगडा

औरंगाबाद : बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी पत्नीसह मित्राला शोधत खुनाचा उलगडा केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

विजय संजयकुमार पाटणी (रा. वडगाव, कोल्हाटी) असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये मृताची पत्नी सारिका विजय पाटणी (३२) व सागर मधुकर सावळे (२५, रा. ११वी योजना, शिवाजीनगर चौक) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; वाल्मी परिसरातील सोलापूर - धुळे महामार्गालगत २७ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तिचा खून झाल्याचे २९ ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. शहर पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्यासह आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान होते. २९ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, साताराच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमाेल म्हस्के, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के, संभाजी गोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.

मृतदेह कुजलेला असल्यामुळे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एमआयडीसी वाळूज ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी सारिका हिने पती विजय हे १८ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकांनी मृताची ओळख पटवली. त्यानंतर आराेपी पत्नी सारिका आणि तिचा मित्र सागर यांची चौकशी केली असता, त्यांनी विजय याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी निरीक्षक बागवडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संभाजी गोरे यांच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा सातारा ठाण्यात नोंदवला.

पती त्रास देत असल्यामुळे संपविलेसारिका व विजयचा १० एप्रिल २०१० रोजी प्रेमविवाह झाला होता. या दोघांना नऊ वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र, काही वर्षांपासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे दोघे एकत्र राहत नव्हते. सारिका बेपत्ता झाल्याची तक्रार विजय याने बेगमपुरा व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंदविली होती. याच काळात सारिकाची मैत्री सागरसोबत झाली. तेव्हापासून ती आईकडेच राहत होती. काही दिवसांपासून विजय हा पत्नीकडे सतत दारू पिऊन येत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला सारिका कंटाळली होती. तिने पतीला संपविण्याचा निर्णय घेतला.

वाल्मी परिसरात प्रेमाने नेलेसारिकाने पतीचा काटा काढण्याची तयारी केली होती. त्यासाठी तिने १८ ऑक्टोबरच्या रात्री पती विजय यास वाल्मी परिसरातील सोलापूर-धुळे महामार्गालगत गोड बोलून नेले. त्यांच्या पाठोपाठ तिचा मित्र सागरही आला. पती-पत्नी बसलेले असतानाच सारिकाने पतीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. सागरही मदतीला होताच. दोघांनी मिळून विजय यास संपविल्यानंतर मृतदेह झुडपात टाकून पोबारा केला. २२ ऑक्टोबरला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून सारिका परभणी जिल्ह्यात नातेवाइकांकडे निघून गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद