शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रेमविवाहात पतीचा त्रास वाढला; फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:03 IST

१८ ऑक्टोबर रोजीच मारले, २७ रोजी सापडला मृतदेह, त्यानंतर गुन्हे शाखेने केला खुनाचा उलगडा

औरंगाबाद : बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी पत्नीसह मित्राला शोधत खुनाचा उलगडा केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

विजय संजयकुमार पाटणी (रा. वडगाव, कोल्हाटी) असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये मृताची पत्नी सारिका विजय पाटणी (३२) व सागर मधुकर सावळे (२५, रा. ११वी योजना, शिवाजीनगर चौक) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; वाल्मी परिसरातील सोलापूर - धुळे महामार्गालगत २७ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तिचा खून झाल्याचे २९ ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. शहर पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्यासह आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान होते. २९ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, साताराच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमाेल म्हस्के, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के, संभाजी गोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.

मृतदेह कुजलेला असल्यामुळे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एमआयडीसी वाळूज ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी सारिका हिने पती विजय हे १८ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकांनी मृताची ओळख पटवली. त्यानंतर आराेपी पत्नी सारिका आणि तिचा मित्र सागर यांची चौकशी केली असता, त्यांनी विजय याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी निरीक्षक बागवडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संभाजी गोरे यांच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा सातारा ठाण्यात नोंदवला.

पती त्रास देत असल्यामुळे संपविलेसारिका व विजयचा १० एप्रिल २०१० रोजी प्रेमविवाह झाला होता. या दोघांना नऊ वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र, काही वर्षांपासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे दोघे एकत्र राहत नव्हते. सारिका बेपत्ता झाल्याची तक्रार विजय याने बेगमपुरा व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंदविली होती. याच काळात सारिकाची मैत्री सागरसोबत झाली. तेव्हापासून ती आईकडेच राहत होती. काही दिवसांपासून विजय हा पत्नीकडे सतत दारू पिऊन येत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला सारिका कंटाळली होती. तिने पतीला संपविण्याचा निर्णय घेतला.

वाल्मी परिसरात प्रेमाने नेलेसारिकाने पतीचा काटा काढण्याची तयारी केली होती. त्यासाठी तिने १८ ऑक्टोबरच्या रात्री पती विजय यास वाल्मी परिसरातील सोलापूर-धुळे महामार्गालगत गोड बोलून नेले. त्यांच्या पाठोपाठ तिचा मित्र सागरही आला. पती-पत्नी बसलेले असतानाच सारिकाने पतीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. सागरही मदतीला होताच. दोघांनी मिळून विजय यास संपविल्यानंतर मृतदेह झुडपात टाकून पोबारा केला. २२ ऑक्टोबरला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून सारिका परभणी जिल्ह्यात नातेवाइकांकडे निघून गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद