शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘पर्यटन राजधानी’ची बिरुदावली कागदावरच; औरंगाबादमध्ये सोयी-सुविधा कोसो दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 14:36 IST

आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गाठायची तर रस्त्याच्या संथ कामामुळे तासन्तास वाहतुकीत अडकावे लागते. छोट्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था तर विचारायलाच नको, हवाई कनेक्टिव्हिटी नावालाच. ही परिस्थिती आहे ‘पर्यटन राजधानी’ आणि ‘पर्यटन जिल्हा’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या औरंगाबादेची. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच औरंगाबादचा निश्चित विकास अपेक्षित आहे, मात्र पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊनही औरंगाबादचा पर्यटनदृष्ट्या विकास कागदावरच आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहेत.

दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. राज्य सरकारने २०१० मध्ये औरंगाबादला राज्याची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले. त्यानंतर १७ एप्रिल २०१५ रोजी औरंगाबाद ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला, मात्र आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते. राज्य शासनाचे पर्यटन राजधानीकडे दुर्लक्ष होत असल्याने देश - विदेशातील पर्यटकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे, अशी ओरड होत आहे.

या स्थळांकडे कोणी लक्ष देणार का?औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पर्यटनस्थळे अजूनही दुर्लक्षित आहेत. या निसर्गसुंदर पर्यटनस्थळांची माहिती अनेकांना नाही. सुलिभंजन, अंतूर गड, जंजाळा किल्ला, पितळखोरे अशी ठिकाणे आता पर्यटकांना खुणावू लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे जवळपास असल्याने पर्यटक आठवडा अखेरच्या सहलीसाठी पहिली पसंती देतात. मात्र, याठिकाणी सोयी सुविधांअभावी पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इतर देशांतील पर्यटनस्थळ विकासाप्रमाणे, स्वच्छता, परवडणारी हॉटेल, सुरक्षा, पायाभूत सुविधांची गरज आहे. पर्यटनस्थळे आणि परिसर विकसित केल्यास देशांतर्गत आणि परदेशी पर्यटक संख्या वाढू शकेल.

सात वर्षांपासून हेलिकाॅप्टर सेवा ‘हवेतच’देशी- विदेशी पर्यटकांसाठी औरंगाबाद ते अजिंठा असे हेलिकॉप्टर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून हेलिकाॅप्टरची सेवा ‘हवेतच’ आहे.

रस्त्यामुळे पर्यटकांची पाठतीन वर्षांपासून औरंगाबाद-अजिंठा-जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. हे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने पर्यटकांना याचा फटका बसत आहे. रस्त्याच्या कामामुळे अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली असल्याची माहिती पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिली. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे म्हैसमाळसह इतर पर्यटनस्थळे गाठण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते.

पर्यटकांची संख्या काय म्हणते?२०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ५४ हजार ४०२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर २०१९-२०मध्ये केवळ ४३ हजार १३० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विदेशी पर्यटक आलेच नाहीत. २०१८-१९ मध्ये २३ लाख १ हजार १०० भारतीय पर्यटकांना तिकीट विक्री झाली. ही संख्या २०१९-२० मध्ये २० लाख ४४ हजार २१ वर आली. २०२०-२१ मध्ये पर्यटन बंद होते. जून ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ४ लाख २४ हजार ६०४ भारतीय आणि ४८४ विदेशी पर्यटकांनी भेट दिली.

‘डेडिकेटेड’ समिती स्थापनकाही दिवसांपूर्वीच ‘डेडिकेटेड’ समिती स्थापन करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. यातून पर्यटनस्थळांसंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी, क्षमता असलेल्या पर्यटनस्थळांचे मार्केटिंग, ‘टुरिझम हब’च्या दृष्टीने सूचना होतील. अजिंठा रस्त्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात १७ सप्टेंबर रोजी पर्यटनमंत्र्यांनी सूचना केली आहे.- डाॅ. श्रीमंत हारकर, उपसंचालक, प्रादेशिक पर्यटन संचालनालय

पर्यटनातील प्रश्न :- ‘बुद्धिस्ट सर्किट’साठी नियोजनाकडे दुर्लक्ष- ३ शहरांपुरती विमानसेवा, विमान कनेक्टिव्हिटीच नाही- वेरूळ, अजिंठाचेच मार्केटिंग, इतर स्थळांकडे दुर्लक्ष- मुंबईपुरतेच उत्सव पर्यटन, औरंगाबादकडे कानाडोळा- वेरूळ-अजिंठ्यातील अभ्यागत केंद्र बंद- वेरूळ लेणीत ई-वाहने, अजिंठा लेणीसाठी ‘एसटी’च्या जुन्या बसेस- जिल्ह्यातील जलाशयात बोटिंग सुविधेचा अभाव- रेल्वे स्टेशनवरील ‘टूरिस्ट इन्फर्मेशन काऊंटर’ बंद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन