शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘पर्यटन राजधानी’ची बिरुदावली कागदावरच; औरंगाबादमध्ये सोयी-सुविधा कोसो दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 14:36 IST

आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गाठायची तर रस्त्याच्या संथ कामामुळे तासन्तास वाहतुकीत अडकावे लागते. छोट्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था तर विचारायलाच नको, हवाई कनेक्टिव्हिटी नावालाच. ही परिस्थिती आहे ‘पर्यटन राजधानी’ आणि ‘पर्यटन जिल्हा’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या औरंगाबादेची. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच औरंगाबादचा निश्चित विकास अपेक्षित आहे, मात्र पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊनही औरंगाबादचा पर्यटनदृष्ट्या विकास कागदावरच आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहेत.

दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. राज्य सरकारने २०१० मध्ये औरंगाबादला राज्याची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले. त्यानंतर १७ एप्रिल २०१५ रोजी औरंगाबाद ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला, मात्र आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते. राज्य शासनाचे पर्यटन राजधानीकडे दुर्लक्ष होत असल्याने देश - विदेशातील पर्यटकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे, अशी ओरड होत आहे.

या स्थळांकडे कोणी लक्ष देणार का?औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पर्यटनस्थळे अजूनही दुर्लक्षित आहेत. या निसर्गसुंदर पर्यटनस्थळांची माहिती अनेकांना नाही. सुलिभंजन, अंतूर गड, जंजाळा किल्ला, पितळखोरे अशी ठिकाणे आता पर्यटकांना खुणावू लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे जवळपास असल्याने पर्यटक आठवडा अखेरच्या सहलीसाठी पहिली पसंती देतात. मात्र, याठिकाणी सोयी सुविधांअभावी पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इतर देशांतील पर्यटनस्थळ विकासाप्रमाणे, स्वच्छता, परवडणारी हॉटेल, सुरक्षा, पायाभूत सुविधांची गरज आहे. पर्यटनस्थळे आणि परिसर विकसित केल्यास देशांतर्गत आणि परदेशी पर्यटक संख्या वाढू शकेल.

सात वर्षांपासून हेलिकाॅप्टर सेवा ‘हवेतच’देशी- विदेशी पर्यटकांसाठी औरंगाबाद ते अजिंठा असे हेलिकॉप्टर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून हेलिकाॅप्टरची सेवा ‘हवेतच’ आहे.

रस्त्यामुळे पर्यटकांची पाठतीन वर्षांपासून औरंगाबाद-अजिंठा-जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. हे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने पर्यटकांना याचा फटका बसत आहे. रस्त्याच्या कामामुळे अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली असल्याची माहिती पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिली. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे म्हैसमाळसह इतर पर्यटनस्थळे गाठण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते.

पर्यटकांची संख्या काय म्हणते?२०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ५४ हजार ४०२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर २०१९-२०मध्ये केवळ ४३ हजार १३० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विदेशी पर्यटक आलेच नाहीत. २०१८-१९ मध्ये २३ लाख १ हजार १०० भारतीय पर्यटकांना तिकीट विक्री झाली. ही संख्या २०१९-२० मध्ये २० लाख ४४ हजार २१ वर आली. २०२०-२१ मध्ये पर्यटन बंद होते. जून ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ४ लाख २४ हजार ६०४ भारतीय आणि ४८४ विदेशी पर्यटकांनी भेट दिली.

‘डेडिकेटेड’ समिती स्थापनकाही दिवसांपूर्वीच ‘डेडिकेटेड’ समिती स्थापन करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. यातून पर्यटनस्थळांसंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी, क्षमता असलेल्या पर्यटनस्थळांचे मार्केटिंग, ‘टुरिझम हब’च्या दृष्टीने सूचना होतील. अजिंठा रस्त्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात १७ सप्टेंबर रोजी पर्यटनमंत्र्यांनी सूचना केली आहे.- डाॅ. श्रीमंत हारकर, उपसंचालक, प्रादेशिक पर्यटन संचालनालय

पर्यटनातील प्रश्न :- ‘बुद्धिस्ट सर्किट’साठी नियोजनाकडे दुर्लक्ष- ३ शहरांपुरती विमानसेवा, विमान कनेक्टिव्हिटीच नाही- वेरूळ, अजिंठाचेच मार्केटिंग, इतर स्थळांकडे दुर्लक्ष- मुंबईपुरतेच उत्सव पर्यटन, औरंगाबादकडे कानाडोळा- वेरूळ-अजिंठ्यातील अभ्यागत केंद्र बंद- वेरूळ लेणीत ई-वाहने, अजिंठा लेणीसाठी ‘एसटी’च्या जुन्या बसेस- जिल्ह्यातील जलाशयात बोटिंग सुविधेचा अभाव- रेल्वे स्टेशनवरील ‘टूरिस्ट इन्फर्मेशन काऊंटर’ बंद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन