शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘पर्यटन राजधानी’ची बिरुदावली कागदावरच; औरंगाबादमध्ये सोयी-सुविधा कोसो दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 14:36 IST

आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गाठायची तर रस्त्याच्या संथ कामामुळे तासन्तास वाहतुकीत अडकावे लागते. छोट्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था तर विचारायलाच नको, हवाई कनेक्टिव्हिटी नावालाच. ही परिस्थिती आहे ‘पर्यटन राजधानी’ आणि ‘पर्यटन जिल्हा’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या औरंगाबादेची. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच औरंगाबादचा निश्चित विकास अपेक्षित आहे, मात्र पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊनही औरंगाबादचा पर्यटनदृष्ट्या विकास कागदावरच आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहेत.

दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. राज्य सरकारने २०१० मध्ये औरंगाबादला राज्याची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले. त्यानंतर १७ एप्रिल २०१५ रोजी औरंगाबाद ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला, मात्र आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते. राज्य शासनाचे पर्यटन राजधानीकडे दुर्लक्ष होत असल्याने देश - विदेशातील पर्यटकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे, अशी ओरड होत आहे.

या स्थळांकडे कोणी लक्ष देणार का?औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पर्यटनस्थळे अजूनही दुर्लक्षित आहेत. या निसर्गसुंदर पर्यटनस्थळांची माहिती अनेकांना नाही. सुलिभंजन, अंतूर गड, जंजाळा किल्ला, पितळखोरे अशी ठिकाणे आता पर्यटकांना खुणावू लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे जवळपास असल्याने पर्यटक आठवडा अखेरच्या सहलीसाठी पहिली पसंती देतात. मात्र, याठिकाणी सोयी सुविधांअभावी पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इतर देशांतील पर्यटनस्थळ विकासाप्रमाणे, स्वच्छता, परवडणारी हॉटेल, सुरक्षा, पायाभूत सुविधांची गरज आहे. पर्यटनस्थळे आणि परिसर विकसित केल्यास देशांतर्गत आणि परदेशी पर्यटक संख्या वाढू शकेल.

सात वर्षांपासून हेलिकाॅप्टर सेवा ‘हवेतच’देशी- विदेशी पर्यटकांसाठी औरंगाबाद ते अजिंठा असे हेलिकॉप्टर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून हेलिकाॅप्टरची सेवा ‘हवेतच’ आहे.

रस्त्यामुळे पर्यटकांची पाठतीन वर्षांपासून औरंगाबाद-अजिंठा-जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. हे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने पर्यटकांना याचा फटका बसत आहे. रस्त्याच्या कामामुळे अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली असल्याची माहिती पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिली. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे म्हैसमाळसह इतर पर्यटनस्थळे गाठण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते.

पर्यटकांची संख्या काय म्हणते?२०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ५४ हजार ४०२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर २०१९-२०मध्ये केवळ ४३ हजार १३० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विदेशी पर्यटक आलेच नाहीत. २०१८-१९ मध्ये २३ लाख १ हजार १०० भारतीय पर्यटकांना तिकीट विक्री झाली. ही संख्या २०१९-२० मध्ये २० लाख ४४ हजार २१ वर आली. २०२०-२१ मध्ये पर्यटन बंद होते. जून ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ४ लाख २४ हजार ६०४ भारतीय आणि ४८४ विदेशी पर्यटकांनी भेट दिली.

‘डेडिकेटेड’ समिती स्थापनकाही दिवसांपूर्वीच ‘डेडिकेटेड’ समिती स्थापन करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. यातून पर्यटनस्थळांसंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी, क्षमता असलेल्या पर्यटनस्थळांचे मार्केटिंग, ‘टुरिझम हब’च्या दृष्टीने सूचना होतील. अजिंठा रस्त्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात १७ सप्टेंबर रोजी पर्यटनमंत्र्यांनी सूचना केली आहे.- डाॅ. श्रीमंत हारकर, उपसंचालक, प्रादेशिक पर्यटन संचालनालय

पर्यटनातील प्रश्न :- ‘बुद्धिस्ट सर्किट’साठी नियोजनाकडे दुर्लक्ष- ३ शहरांपुरती विमानसेवा, विमान कनेक्टिव्हिटीच नाही- वेरूळ, अजिंठाचेच मार्केटिंग, इतर स्थळांकडे दुर्लक्ष- मुंबईपुरतेच उत्सव पर्यटन, औरंगाबादकडे कानाडोळा- वेरूळ-अजिंठ्यातील अभ्यागत केंद्र बंद- वेरूळ लेणीत ई-वाहने, अजिंठा लेणीसाठी ‘एसटी’च्या जुन्या बसेस- जिल्ह्यातील जलाशयात बोटिंग सुविधेचा अभाव- रेल्वे स्टेशनवरील ‘टूरिस्ट इन्फर्मेशन काऊंटर’ बंद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन