शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात टेम्पो उलटला; पाण्यात बुडून बापाचा मृत्यू, चिमुकलीचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 19:22 IST

वळणावर रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने कालव्यात टेम्पो उलटला

- जयेश निरपळगंगापूर: नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या पाण्यात टेम्पो उलटून झालेल्या अपघातात सुधाकर अशोक वैराळ(३०, रा.वरखेड ता.गंगापूर ) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची तीन वर्षाची मुलगी श्रद्धा पाण्यात वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे. सदरील घटना गंगापूर वैजापूर मार्गावरील वरखेड पाटी येथील नांमक कालव्याच्या जवळ मंगळवारी (२९) रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की तालुक्यातील वरखेड येथील सुधाकर वैराळ हे सोमवारी आपल्या तीन वर्षीय मुलीसह टेम्पो (एमएच २० ईजी ०९६६) चालवत गंगापूरहून नांदूर मधमेश्वर कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्याने वरखेड गावाकडे जात असताना दुपारी एकच्या दरम्यान गंगापूर वैजापूर मार्गापासून एक किमी अंतरावर एका ठिकाणी वळण घेतांना टेम्पो कालव्याच्या पाण्यात उलटला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन जेसीबीच्या मदतीने टेम्पो कालव्यातून पाण्याच्या बाहेर काढला. त्यांनतर सुधारक मैराळ यांना टेम्पो बाहेर घेऊन सागर शेजवळ यांच्या रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून सुधाकर यांना मृत घोषित केले. तर तीन वर्षांच्या मुलीचा शोध सुरु आहे. घटनेची शिल्लेगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे 

घरात एक महिन्याची तांन्हुलीशविच्छेदनानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सुधाकर यांच्या पार्थिवावर वरखेड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांना एक मुलगी झाली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. ऐन रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला एकुलता एक भाऊ गमावल्याने सुधाकर यांच्या तिन्ही बहिणींनी हंबरडा फोडला होता. 

रस्ता अडवल्याने अपघातवरखेड गावात जाण्या-येण्यासाठी नांमक कालव्याच्या बाजूने रस्ता असून हा रस्ता सदरील अपघात स्थळाजवळच एका व्यक्तीने जागेचा मोबदला मिळाला नाही म्हणून अडवला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे येथे अनेकदा वाहने घसरून अपघात देखील झाले आहे. याविषयी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आले. मात्र तरीही प्रशासनाला जाग आली नाही. सुधाकर यांचा दुर्दैवी मृत्यू देखील अडवलेल्या रस्त्याच्या खालून पाण्याच्या बाजूने टेम्पो धोकादायक रित्या चालवताना झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू