शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सूर्य आग ओकतोय; बाष्पीभवनाने नाथसागरातून साडेआठ टीएमसी पाणी उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 19:04 IST

जायकवाडी धरणातून होणारे बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हानी लक्षात घेता जलाशयाच्या विस्तीर्ण पाण पसाऱ्यावर तरंगते सोलार प्लेट टाकण्याबाबत काही वर्षांपासून चर्चा होत आहे.

- संजय जाधवपैठण : कमी खोलीचा व उथळ असा विस्तीर्ण पानपसारा लाभल्याने नाथसागराच्या जलाशयात खोलवर सूर्यकिरणे पोहोचतात. यामुळे बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. तापमानात वाढ झाल्याने यंदा आतापर्यंत २४३.११६ दलघमी (८.५८ टीएमसी) पाणी बाष्पीभवनाने जलाशयातून कमी झाल्याचे पुढे आले आहे. बाष्पीभवनाने कमी झालेल्या पाण्यात जायकवाडीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना साधारण दोन वर्षे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो, यावरून बाष्पीभवनाची तीव्रता किती आहे हे समोर येते. जायकवाडी धरणात आजच्या स्थितीत १२५३.६४१ दलघमी (५७.७४ टक्के) एवढा उपयुक्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला तो ५६.६२ टक्के एवढा होता, असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

तापमानाचा पारा वाढत असल्याने जायकवाडीच्या जलाशयातील बाष्पीभवन प्रक्रिया गतीने वाढली. विशेष म्हणजे १७ एप्रिलला जवळपास दोन दलघमी (१.८१) बाष्पीभवन झाल्याची नोंद असून, यंदाचा बाष्पीभवनाचा हा उच्चांक आहे. जायकवाडी धरणातून सरासरी दरवर्षी बाष्पीभवन प्रक्रियेेत जवळपास ११ टीएमसी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर आले असून, ही चिंताजनक बाब आहे. सन २०१६ व २०१९ ला मार्च महिन्यापासूनच जायकवाडीच्या मृत साठ्यातून पाणी उचलण्याची वेळ ओढवली होती. या काळात बाष्पीभवन प्रक्रियेने वाया जाणाऱ्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. जायकवाडी धरणातून विविध शहरांना पिण्यासाठी व वाळूज, शेंद्रा, पैठण, जालना औद्योगिक वसाहतीसाठी दररोज ०•२८९ दलघमी एवढा पाणीपुरवठा होतो. आजच्या तारखेस या उलट केवल बाष्पीभवन प्रक्रियेत याच्या सहापट म्हणजे १.८१ दलघमी पाणी बाष्पीभवन प्रक्रियेत नष्ट होत आहे. दरम्यान, यंदा धरणात जलसाठा चांगला असून, येणाऱ्या हंगामात प्रत्यक्षात पाऊस कसा राहील हे सांगता येत नसल्याने धरणात अपेक्षित जलसाठा असणे भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

बाष्पीभवन प्रक्रियेस प्रतिबंध करणे अवघडबाष्पीभवन प्रक्रियेची गती कमी करण्यासाठी जलाशयावर रसायने फवारण्याचा अवलंब केला जातो. परंतु, जायकवाडीचा पानपसारा हा ३५ हजार हेक्टर असा विस्तीर्ण असल्याने अशी उपाययोजना करणे शक्य नसल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

तरंगते सोलार प्लेटचा वापर?जायकवाडी धरणातून होणारे बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हानी लक्षात घेता जलाशयाच्या विस्तीर्ण पाण पसाऱ्यावर तरंगते सोलार प्लेट टाकण्याबाबत काही वर्षांपासून चर्चा होत आहे. सोलार प्लेटने बाष्पीभवन प्रक्रियेचा वेग घटविता येईल व विद्युत निर्मितीही होईल अशा पद्धतीची विचारधारा जायकवाडी प्रशासनात चर्चिली जात आहे. मात्र, पक्षी अभयारण्यामुळे या योजनेला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. परंतु, असे प्रमाणपत्र मिळणे अवघड असून, सध्यातरी याबाबत प्रशासकीय स्तरावर कुठल्याच हालचाली नाही.

गत सात दिवसांत झालेले बाष्पीभवनतारीख | बाष्पीभवन(दलघमी)१२/४/२२ | १.५९१३/४/२२ | १.६४१४/४/२२ | १.५५१५/४/२२ | १.४६१६/४/२२ | १.५११७/४/२२ | १.८११८/४/२२ | १.७८

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद