शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड वादाच्या भोवऱ्यात; पाच वर्षांपासून लटकली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:56 IST

नवीन शासननिर्णयानुसार ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन’ योजना राबविणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची रचनाच बदलून टाकली आहे.

छत्रपती संभाजीनगर : वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविण्याची जबाबदारी जि.प. समाजकल्याण विभागाऐवजी आता पंचायत विभागाकडे सोपविल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकतर गेल्या पाच वर्षांपासून कलावंतांच्या निवडी रखडल्या आहेत. दुसरीकडे आता योजना राबविण्याचा वाद निर्माण झाल्यामुळे ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी योजनेची गत झाली.

नवीन शासननिर्णयानुसार ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन’ योजना राबविणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची रचनाच बदलून टाकली आहे. पूर्वी ही योजना जि.प. समाज कल्याण विभागाकडे होती. ती आता जि.प. पंचायत विभागाकडे सोपविली आहे. त्यास महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने राज्यस्तरावर विरोध केला. संघटनेचे म्हणणे आहे की, या योजनेत शहरी आणि ग्रामीण लाभार्थी आहेत. त्यामुळे ऑनलाइन अर्जाची पडताळणी करणे, अर्जात त्रुटी निघाल्यास संबंधितांना बोलाविणे, दरवर्षी हयातीसंदर्भात सत्यता पडताळणे, खात्यात जमा रकमेची पडताळणी करण्यासाठी या विभागाकडे शहरी भागात यंत्रणा नाही.

अगोदरच पंचायत विभागाकडे कामाचा मोठा भार आहे. राज्यभरात सारखीच अवस्था आहे. ही योजना राबविण्यासाठी शासनाने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असते तर अडचण आली नसती. त्यामुळे संघटनेने ही योजना राबविण्यास नकार दिला आहे. आता ऑनलाइन पोर्टल सुरू झाले आहे. पण, मूळ कागदपत्रे अपलोड करायचे की पंचायत विभागात जमा करायचे, या बद्दलही संदिग्धता आहे. पूर्वी निवड समितीचे अध्यक्ष- उपाध्यक्ष हे पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले अशासकीय सदस्य होते. आता समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी, तर आता पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव असणार आहेत. अगोदर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव होते.

लाभार्थ्यांची निवड रखडलेलीआता ५ हजारांचे मानधन या योजनेसाठी मागील ५ वर्षांपासून लाभार्थ्यांची निवड रखडलेली आहे. आता नवीन शासननिर्णयानुसार १५ वर्षे कला व साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलावंत आणि साहित्यिकांना ५ हजाराचे मानधन दिले जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८०० जण या योजनेचे लाभार्थी असून वर्षाला १०० लाभार्थी निवडण्याच्या सूचना आहेत. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून न दिल्यामुळे पूर्वीप्रमाणेच ही योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात यावी, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे.- डॉ. ओमप्रसाद रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पंचायत विभाग. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदartकला