शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 17:11 IST

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला.

औरंगाबाद - राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून साखर, हरभरा डाळ, रवा आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला. पण, या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली. मात्र, तरीही आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचल्याचा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. 

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले. त्यामुळे, गोरगरीबांची दिवाळी अर्धवट आनंदानेच साजरी झाली. मात्र, कॅबिनेटमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हा विरोधकांचा अपप्रचार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे मी स्वत: आनंदाचा शिधा वाटलाय, तोही सगळ्यांना मिळालाय, असेही ते म्हणाले.  

आनंदाचा शिरा सगळीकडे पोहोचलेला असून मी स्वतः शिधा वाटप केलेला आहे. सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली आहे, असा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केलाय. कुठे साखर पोहोचली नाही, कुठे तेल पोहोचलं नाही, कुठे शिधा पोहोचला नाही असं म्हणणे हे विरोधकांचे कामच आहे, असा टोला देखील भुमरे यांनी विरोधकांना लगावला आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावे यासाठी गावात आनंदाच्या शिधाचे वाटप होत आहे. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं कुठलंही काम नाही, असंही भुमरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंची घोषणा आम्ही पूर्ण केली

उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले, त्यांनी दौरा केला ते बांधावर गेले. आमचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार देखील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. त्यांनी स्वतः पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. नुकसानीचा आकडा आल्यानंतर शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा बारा महिन्यांपूर्वी केली होती. ती अमलात आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले आहे. आमचं सरकार नुसत्या घोषणा करत नाहीत. उद्धव ठाकरेंनी वर्षभरापूर्वी जाहीर केलेलं पन्नास हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळालं आहे, असेही भुमरे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेDiwaliदिवाळी 2022