शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 17:11 IST

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला.

औरंगाबाद - राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून साखर, हरभरा डाळ, रवा आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला. पण, या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली. मात्र, तरीही आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचल्याचा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. 

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले. त्यामुळे, गोरगरीबांची दिवाळी अर्धवट आनंदानेच साजरी झाली. मात्र, कॅबिनेटमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हा विरोधकांचा अपप्रचार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे मी स्वत: आनंदाचा शिधा वाटलाय, तोही सगळ्यांना मिळालाय, असेही ते म्हणाले.  

आनंदाचा शिरा सगळीकडे पोहोचलेला असून मी स्वतः शिधा वाटप केलेला आहे. सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली आहे, असा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केलाय. कुठे साखर पोहोचली नाही, कुठे तेल पोहोचलं नाही, कुठे शिधा पोहोचला नाही असं म्हणणे हे विरोधकांचे कामच आहे, असा टोला देखील भुमरे यांनी विरोधकांना लगावला आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावे यासाठी गावात आनंदाच्या शिधाचे वाटप होत आहे. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं कुठलंही काम नाही, असंही भुमरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंची घोषणा आम्ही पूर्ण केली

उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले, त्यांनी दौरा केला ते बांधावर गेले. आमचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार देखील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. त्यांनी स्वतः पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. नुकसानीचा आकडा आल्यानंतर शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा बारा महिन्यांपूर्वी केली होती. ती अमलात आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले आहे. आमचं सरकार नुसत्या घोषणा करत नाहीत. उद्धव ठाकरेंनी वर्षभरापूर्वी जाहीर केलेलं पन्नास हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळालं आहे, असेही भुमरे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेDiwaliदिवाळी 2022