शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 17:11 IST

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला.

औरंगाबाद - राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून साखर, हरभरा डाळ, रवा आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला. पण, या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली. मात्र, तरीही आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचल्याचा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. 

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले. त्यामुळे, गोरगरीबांची दिवाळी अर्धवट आनंदानेच साजरी झाली. मात्र, कॅबिनेटमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हा विरोधकांचा अपप्रचार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे मी स्वत: आनंदाचा शिधा वाटलाय, तोही सगळ्यांना मिळालाय, असेही ते म्हणाले.  

आनंदाचा शिरा सगळीकडे पोहोचलेला असून मी स्वतः शिधा वाटप केलेला आहे. सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली आहे, असा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केलाय. कुठे साखर पोहोचली नाही, कुठे तेल पोहोचलं नाही, कुठे शिधा पोहोचला नाही असं म्हणणे हे विरोधकांचे कामच आहे, असा टोला देखील भुमरे यांनी विरोधकांना लगावला आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावे यासाठी गावात आनंदाच्या शिधाचे वाटप होत आहे. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं कुठलंही काम नाही, असंही भुमरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंची घोषणा आम्ही पूर्ण केली

उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले, त्यांनी दौरा केला ते बांधावर गेले. आमचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार देखील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. त्यांनी स्वतः पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. नुकसानीचा आकडा आल्यानंतर शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा बारा महिन्यांपूर्वी केली होती. ती अमलात आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले आहे. आमचं सरकार नुसत्या घोषणा करत नाहीत. उद्धव ठाकरेंनी वर्षभरापूर्वी जाहीर केलेलं पन्नास हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळालं आहे, असेही भुमरे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेDiwaliदिवाळी 2022