शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

भावी जवानांचे हाल, अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण उपाशी; 10 रुपयांची पाणीबॉटल 30 रुपयाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 2:41 PM

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

औरंगाबाद - केंद्रीय संरक्षण दलाने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेअंर्गत सैन्य भरती लवकरच सुरु होत आहे. औरंगाबादमध्ये अग्निपथ (Agnipath) योजनेअंतर्गत अग्नीवीरांचीही भरती केली जात आहे. त्यानुसार, 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पात्र तरुणांची निवड केली जाईल. या भरतीत औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुण सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचले आहेत. मात्र, येथे आलेल्या उमेदवारांची, भावी जवानांची मोठी ससेहेलपाट होताना दिसत आहे. ना खायला अन्न, ना प्यायला पाणी, झोपायलाही आसरा नाही. त्यामुळे, या भरतीच्या विद्यार्थ्यांन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्निवीरांची भरती सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र, या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. याउलट मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागल्याने युवकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच, रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात. भावी जवानांचे सुरू असलेले हाल आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. 

भविष्यात देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहणार आहे, अशा तरुणांना रात्रभर रोडवर झोपून, न पाणी पिता आणि न काही खाता राहावे लागत आहे. विशेष म्हणजे काही युवकांना रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, युवकांकडून तीव्र संतापही व्यक्त होत आहे. तर, प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभारावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाAurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान