शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाड्यात मान्सूनची सुरुवात मंद; पेरण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:26 IST

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस औरंगाबाद, जालना आणि हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत नोंदविला गेला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सूनची सुरुवात मंदपणे झाली आहे. मान्सूनला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत. २०२० साली जून महिन्यातील २० तारखेपर्यंत १३९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. २०२१ सालच्या जून महिन्यातील २० तारखेपर्यंत ५९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत ६० टक्के कमी पाऊस झाला आहे, तर नियमित पर्जन्यमानाच्या तुलनेत २५ टक्के कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला आहे. पेरण्यांचा वेग वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.

वर्ष २०२० आणि २०२१ साली कोरोनाच्या दोन लाटांमुळे लॉकडाऊन होते. प्रदूषणाचे प्रमाण त्यामुळे घटले. दैनंदिनीला ब्रेक लागल्यामुळे हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. त्याचा परिणाम पर्जन्यमान उंचावण्यावर झाल्याचे बोलले गेले. यंदा मात्र पावसाला विलंब झाला आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस औरंगाबाद, जालना आणि हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत नोंदविला गेला आहे. गेल्या दोन वर्षांत या जिल्ह्यांमध्ये मान्सूनची दमदार सुरुवात झाली होती.

२०२१ साली औरंगाबाद जिल्ह्यात आजवर ९३.७ मि.मी., जालना १२८ मि.मी., बीड १४१ मि.मी., लातूर १४९ मि.मी., उस्मानाबाद ९७.२ मि.मी., नांदेड १६९ मि.मी., परभणी १९९ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात १७९.५ मि.मी पाऊस झाला होता, तर २०२० साली औरंगाबादमध्ये १७९ मि.मी., जालना १६१, बीड १४४, लातूर १२६, उस्मानाबाद १०२, नांदेड १०९, परभणी १४४, तर हिंगोलीत १५७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

यंदा विभागात जिल्हानिहाय झालेला पाऊसऔरंगाबाद-----५३.९ मि.मी.जालना-----४९.८ मि.मी.बीड-----६२.४ मि.मी.लातूर-----६०.८ मि.मी.उस्मानाबाद----४९.९ मि.मी.नांदेड-----६७.६ मि.मी.परभणी-----६४.३ मि.मी.हिंगोली----५६.५ मि.मी.एकूण-----५९.२ मि.मी.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद