शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामकरण प्रकरणाला पुन्हा हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:34 IST

१९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याचा नारा दिला होता.

औरंगाबाद : जिल्ह्याचे नामकरण औरंगाबादवरून ‘संभाजीनगर’ करण्याच्या जुन्या प्रस्तावाला आगामी महापालिका निवडणूक आणि शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हवा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. ४ मार्च, २०२० रोजी विभागीय प्रशासनाने नामकरणाच्या अनुषंगाने एनओसी व न्यायालयीन याचिकेसंदर्भात माहिती शासनाला पुरविली होती. प्रशासकीय पातळीवर सध्या हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित असले, तरी राज्य सरकारने उद्या २९ जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामकरणाचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

१९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याचा नारा दिला होता. त्यानंतर, जून, १९९५ मध्ये औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हे नामकरण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. दरम्यान, राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पुढे १९९९ साली राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. २०१४ साली सेना-भाजप युती सत्तेत आल्यानंतर नामकरणाच्या प्रस्तावाला पुन्हा हवा मिळाली, परंतु निर्णय झाला नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युती तुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ४ मार्च, २०२० रोजी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याबाबतची न्यायालय याचिका, विविध विभागांच्या एनओसीबाबत विभागीय प्रशासनाकडून माहिती मागविण्यात आली. विभागीय प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व माहिती संकलित करून माहिती शासनाकडे पाठविली.

मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिकामुख्यमंत्री हा निर्णय घेणारच होते. त्यांनी वारंवार याबाबत भूमिका मांडलीच होती. बंडखोरीचा आणि या प्रस्तावाचा काहीही संबंध नाही. फडणवीस सरकारने याबाबत प्रस्ताव पाठविलेला नव्हता. शिवसेनाप्रमुखांची भूमिका मुख्यमंत्री पुढे घेऊन जात असून, त्यांचे पुत्र म्हणून त्यांनी ठामपणे हा निर्णय घेतला आहे. आजवर राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे नामकरणाचा प्रस्ताव गेलेला नसावा, अशी माझी माहिती आहे.- आ.अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना.

खुर्ची वाचविण्यासाठी खटाटोपमुख्यमंत्र्यांनी ८ जून रोजीच्या सभेतच जाहीर केलं होतं. शहराचा सर्वांगीण विकास करू, त्यानंतरच नामकरण करू. मग या पंधरवड्यात शहराचा कोणता विकास झाला आहे? खुर्ची वाचविण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. यापूर्वीही राजकीय पक्षांनी महापुरुषांची नावे समोर करून राजकारण केले आहे, हा त्यातीलच प्रकार आहे.इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद.

उशिरा सुचलेले शहाणपण....राज्य सरकारने आजवर केंद्राकडे प्रस्ताव पाठविलेला नाही, हे स्पष्ट होत आहे. विधिमंडळात निर्णय झाला पाहिजे, स्व. विलासराव देशमुख यांच्या काळात प्रस्ताव रद्द झाला होता. तसेच मनपाकडून देखील शासनाला प्रस्ताव मागवावा लागेल.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ