शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जायकवाडीत येणारा नाशिकच्या पाण्याचा ओघ घटला; चार दिवसात जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 20:16 IST

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी वळविण्यात आल्याने तेथील पाणी जायकवाडी धरणात येण्याची आशा धुसर झाली आहे.

पैठण:नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गेल्या चार दिवसात जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान गोदावरीतून धरणात दाखल होणाऱ्या पाण्याचा ओघ जवळपास बंद झाला असून बुधवारी केवळ ७२० क्युसेक्स क्षमतेने पाणी गोदावरीतून धरणात दाखल होत होते. 

नाशिकचेपाणी दाखल झाल्याने जायकवाडीचा जलसाठा ३४.५२%  इतका झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग सोमवारी मध्यरात्री बंद करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला असून नाममात्र दराने जायकवाडीत पाणी दाखल होत आहे. बुधवारी गोदावरीतून  फक्त ७२० क्युसेक्स क्षमते पाणी जायकवाडी कडेयेत असल्याची नोंद नागमठान येथील सरिता मापण केंद्रावर झाली आहे.

८ सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने तेथील धरण समुहातील गंगापूर, कडवा, करंजवन, पालखेड, दारणा आदी धरणातून विसर्ग करण्यात आल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी पात्रात २५ हजार क्युसेक्स पेक्षा जास्त विसर्ग करण्यात आला होता. यामुळे गोदावरीस यंदाचा पहिला पूर आला, हे पाणी १० सप्टेंबरला मध्यरात्री जायकवाडी धरणात दाखल झाले. गेल्या चार दिवसात या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात दोन टक्क्यानी वाढ झाली. परंतु तेथील धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने धरणात येणारे पाणीही बंद झाले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी वळविण्यात आल्याने तेथील पाणी जायकवाडी धरणात येण्याची आशा धुसर झाली आहे. बुधवारी धरणाची पाणीपातळी १५०७.२५ फूट झाली असून धरणात १४८७.५८१ दलघमी एकूण जलसाठा झाला आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप संरक्षण पाळी अंतर्गत धरणाच्या डावा कालवा ५०० व उजवा कालवा ९०० क्युसेक्स क्षमतेने सोडण्यात आला आहे. बुधवारी धरणात १८५३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसNashikनाशिकWaterपाणी