शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जायकवाडीचे दरवाजे अर्ध्या फुटाने केले बंद; नाशिककडून येणारी आवक घटल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:08 IST

आगामी काळात धरणक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक याआधारे धरणाचे दरवाजे कमी-अधिक प्रमाणात उघडले जाऊ शकतात.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे दरवाजे १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अर्ध्या फुटाने बंद करण्यात आले. धरणातून गोदावरी पात्रात सोडण्यात येणारा विसर्गदेखील कमी करण्यात आला आहे. नाशिककडील धरणातून येणारी आवक घटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी काळात धरणक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक याआधारे धरणाचे दरवाजे कमी-अधिक प्रमाणात उघडले जाऊ शकतात. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या ४३ गावांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. धरणात सध्या ९० टक्के पाणीसाठा आहे. ८ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सध्या सुरू आहे. धरणाचे दरवाजे क्रमांक १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२ व २५ असे १० दरवाजे ०.५ फुटाने बंद करण्यात आले आहेत. ५ हजार २४० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात कमी करण्यात आले आहे. 

९ हजार ४३२ क्युसेक पाणी ३१ जुलैपर्यंत सोडणे सुरू होते. सध्या ४ हजार १९२ क्युसेक दरवाजांतून व १५८९ क्युसेक पाणी जलविद्युत केंद्रातून असे एकूण ५ हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सात दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले हाेते. सुरुवातील २६ हजार क्युसेक पाणी धरणातून विसर्ग करण्यात आले. ३२ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरू होती.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस