शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

जायकवाडीचे दरवाजे अर्ध्या फुटाने केले बंद; नाशिककडून येणारी आवक घटल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:08 IST

आगामी काळात धरणक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक याआधारे धरणाचे दरवाजे कमी-अधिक प्रमाणात उघडले जाऊ शकतात.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे दरवाजे १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अर्ध्या फुटाने बंद करण्यात आले. धरणातून गोदावरी पात्रात सोडण्यात येणारा विसर्गदेखील कमी करण्यात आला आहे. नाशिककडील धरणातून येणारी आवक घटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी काळात धरणक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक याआधारे धरणाचे दरवाजे कमी-अधिक प्रमाणात उघडले जाऊ शकतात. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या ४३ गावांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. धरणात सध्या ९० टक्के पाणीसाठा आहे. ८ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सध्या सुरू आहे. धरणाचे दरवाजे क्रमांक १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२ व २५ असे १० दरवाजे ०.५ फुटाने बंद करण्यात आले आहेत. ५ हजार २४० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात कमी करण्यात आले आहे. 

९ हजार ४३२ क्युसेक पाणी ३१ जुलैपर्यंत सोडणे सुरू होते. सध्या ४ हजार १९२ क्युसेक दरवाजांतून व १५८९ क्युसेक पाणी जलविद्युत केंद्रातून असे एकूण ५ हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सात दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले हाेते. सुरुवातील २६ हजार क्युसेक पाणी धरणातून विसर्ग करण्यात आले. ३२ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरू होती.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस