शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

जायकवाडीचे दरवाजे अर्ध्या फुटाने केले बंद; नाशिककडून येणारी आवक घटल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:08 IST

आगामी काळात धरणक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक याआधारे धरणाचे दरवाजे कमी-अधिक प्रमाणात उघडले जाऊ शकतात.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे दरवाजे १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अर्ध्या फुटाने बंद करण्यात आले. धरणातून गोदावरी पात्रात सोडण्यात येणारा विसर्गदेखील कमी करण्यात आला आहे. नाशिककडील धरणातून येणारी आवक घटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी काळात धरणक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक याआधारे धरणाचे दरवाजे कमी-अधिक प्रमाणात उघडले जाऊ शकतात. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या ४३ गावांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. धरणात सध्या ९० टक्के पाणीसाठा आहे. ८ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सध्या सुरू आहे. धरणाचे दरवाजे क्रमांक १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२ व २५ असे १० दरवाजे ०.५ फुटाने बंद करण्यात आले आहेत. ५ हजार २४० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात कमी करण्यात आले आहे. 

९ हजार ४३२ क्युसेक पाणी ३१ जुलैपर्यंत सोडणे सुरू होते. सध्या ४ हजार १९२ क्युसेक दरवाजांतून व १५८९ क्युसेक पाणी जलविद्युत केंद्रातून असे एकूण ५ हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सात दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले हाेते. सुरुवातील २६ हजार क्युसेक पाणी धरणातून विसर्ग करण्यात आले. ३२ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरू होती.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस