शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

राज्यराणी एक्स्प्रेसमधील बोगींची, स्वच्छतागृहाची अवस्था वाईट; विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी

By संतोष हिरेमठ | Updated: September 8, 2025 20:02 IST

मुंबईसाठी नवी रेल्वे द्याच; पण ‘राज्यराणी’कडे थोडं लक्ष द्या !

छत्रपती संभाजीनगर : जनशताब्दी, वंदे एक्स्प्रेस पळविल्यानंतर आता प्रवाशांना सकाळी १० वाजता मुंबईत पोहोचण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेसचा एकमेव पर्याय उरला आहे. त्यासाठी पहाटे तीन वाजता उठण्याचीही प्रवाशांची तयारी आहे. मात्र, या रेल्वेच्या बोगींची, स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. शिवाय या रेल्वेत विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी रोखण्याकडेही दुर्लक्ष होते. याकडे दक्षिण मध्य रेल्वेने थोडे लक्ष दिल्यास ही रेल्वे मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना अधिक सोयीची ठरेल.

पूर्वी छत्रपती संभाजीनगरहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आधी जालना आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. जालन्याहून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेसही नांदेडला पळविण्यात आली. या दोन्ही रेल्वे मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांच्या फारशा सोयीच्या राहिल्या नाहीत. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडला पळविल्यानंतर मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू केली जाईल, असे सांगितले जाते. नवीन रेल्वे मिळेल तेव्हा मिळेल; परंतु आजघडीला मुंबईला लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने राज्यराणी एक्स्प्रेस महत्त्वाची ठरते; परंतु या रेल्वेच्या बोगीच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.

सीट्स म्हणजे निव्वळ बेंचराज्यराणी एक्स्प्रेसमधील सीट्स म्हणजे निव्वळ बेंच आहेत. आरामदायी प्रवासच होत नाही. स्वच्छतागृहात पायही ठेवावा वाटत नाही. पेंट्री कारदेखील नाही, असे प्रवाशांनी सांगितले. राज्यराणी एक्स्प्रेसने मुंबईहून परतीचा प्रवास करताना लोकलचे प्रवासी, विनाआरक्षित प्रवासी आरक्षित बोगीत दमदाटी करून मिळेल त्या जागेवर ठिय्या मांडतात. आरक्षित तिकीटधारकाला ‘आमचे रोजचे आहे’, असे म्हणतात. खूप भयंकर अनुभव होता, असे अन्य एका प्रवाशाने ‘लोकमत’ला सांगितले.

सुसज्ज बोगींची गरजराज्यराणी एक्स्प्रेस ही मुंबईला लवकर पोहोचण्यासाठी सोयीची आहे; परंतु बोगींची अवस्था वाईट आहे. याकडे दक्षिण मध्य रेल्वेने लक्ष दिले पाहिजे. एलएचबी कोच जोडल्या पाहिजेत.- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर