शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा आकडा तीन हजार कोटींच्या दिशेने

By विकास राऊत | Updated: November 3, 2022 12:58 IST

दोन महिन्यांत १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील ४, तर नांदेड जिल्ह्यातील ३ अशा ७ तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. नुकसानभरपाईचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाणार असून, शासन याबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

यंदा मराठवाड्यात ४८ लाख २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके चार महिन्यांत वाया गेली आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्याच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटी रुपयांची मदत शासनाने केली आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी सध्या २७०० कोटींची मागणी आहे, उर्वरित सात तालुक्यांतील पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईच्या मदत मागणीचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाऊ शकतो.

औरंगाबाद जिल्ह्यात ६८ टक्के, जालना ६३ टक्के, परभणी ४३ टक्के, हिंगोली ६४ टक्के, नांदेड ७३ टक्के, बीड ६४ टक्के, तर लातूर ५५ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात ६७ टक्के मिळून विभागात सध्या ६३ टक्के नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. पूर्ण पंचनाम्यानंतर ७० टक्क्यांवर नुकसानीचे प्रमाण जाऊ शकते.

किती शेतकऱ्यांचे नुकसान?मराठवाड्यात चार महिन्यांतील पावसामुळे २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांत १९ लाख हेक्टर कोरडवाहू, तर ८ हजार ४७१ बागायती आणि २६ हजार ४४९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र