शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा आकडा तीन हजार कोटींच्या दिशेने

By विकास राऊत | Updated: November 3, 2022 12:58 IST

दोन महिन्यांत १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील ४, तर नांदेड जिल्ह्यातील ३ अशा ७ तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. नुकसानभरपाईचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाणार असून, शासन याबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

यंदा मराठवाड्यात ४८ लाख २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके चार महिन्यांत वाया गेली आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्याच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटी रुपयांची मदत शासनाने केली आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी सध्या २७०० कोटींची मागणी आहे, उर्वरित सात तालुक्यांतील पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईच्या मदत मागणीचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाऊ शकतो.

औरंगाबाद जिल्ह्यात ६८ टक्के, जालना ६३ टक्के, परभणी ४३ टक्के, हिंगोली ६४ टक्के, नांदेड ७३ टक्के, बीड ६४ टक्के, तर लातूर ५५ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात ६७ टक्के मिळून विभागात सध्या ६३ टक्के नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. पूर्ण पंचनाम्यानंतर ७० टक्क्यांवर नुकसानीचे प्रमाण जाऊ शकते.

किती शेतकऱ्यांचे नुकसान?मराठवाड्यात चार महिन्यांतील पावसामुळे २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांत १९ लाख हेक्टर कोरडवाहू, तर ८ हजार ४७१ बागायती आणि २६ हजार ४४९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र