शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा आकडा तीन हजार कोटींच्या दिशेने

By विकास राऊत | Updated: November 3, 2022 12:58 IST

दोन महिन्यांत १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील ४, तर नांदेड जिल्ह्यातील ३ अशा ७ तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. नुकसानभरपाईचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाणार असून, शासन याबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

यंदा मराठवाड्यात ४८ लाख २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके चार महिन्यांत वाया गेली आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्याच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटी रुपयांची मदत शासनाने केली आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी सध्या २७०० कोटींची मागणी आहे, उर्वरित सात तालुक्यांतील पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईच्या मदत मागणीचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाऊ शकतो.

औरंगाबाद जिल्ह्यात ६८ टक्के, जालना ६३ टक्के, परभणी ४३ टक्के, हिंगोली ६४ टक्के, नांदेड ७३ टक्के, बीड ६४ टक्के, तर लातूर ५५ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात ६७ टक्के मिळून विभागात सध्या ६३ टक्के नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. पूर्ण पंचनाम्यानंतर ७० टक्क्यांवर नुकसानीचे प्रमाण जाऊ शकते.

किती शेतकऱ्यांचे नुकसान?मराठवाड्यात चार महिन्यांतील पावसामुळे २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांत १९ लाख हेक्टर कोरडवाहू, तर ८ हजार ४७१ बागायती आणि २६ हजार ४४९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र