शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करावा : खंडपीठ

By प्रभुदास पाटोळे | Updated: January 19, 2024 12:38 IST

तूर्तास शासनाने निधी देवून मनपाकडून टप्या टप्याने वसूल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी स्वत: मार्ग काढून योजनेनुसारचा छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठीचा मनपाचा स्वनिधीचा ३० टक्के हिस्सा ८२२.२२ कोटी रुपये शासनातर्फे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी गुरुवारी (दि.१८) दिले.

तूर्तास या निधीचा भार राज्य शासनाने उचलून महापालिकेकडून १०-२० वर्षांत अथवा शासन ठरवेल त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही रक्कम वसूल करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. या जनहित याचिकेवर १३ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. मुख्य सरकारी वकिलांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी स्वत: चर्चा करावी. त्यांना उच्च न्यायालयाच्या निधी संदर्भातील १३ जुलै २०२३ चे आदेश आणि महापालिकेचा निधी उभा करण्याबाबतची असमर्थता निदर्शनास आणून द्यावी. सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची परिस्थिती ‘समांतर’ सारखी होऊ नये. संभाजीनगरवासीयांना गेली २० वर्षांपासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. ६ ते ७ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो, हे खास निदर्शनास आणून द्यावे, असे खंडपीठाने सरकारी वकिलांना निर्देश दिले.

सदर पाणीपुरवठा योजोची सुधारित किंमत २७४०.७५ कोटी आहे. केंद्र शासनाने त्यांचा २५ टक्के हिस्सा ६८५.१९ कोटी रुपये व राज्य शासनाने त्यांचा ४५ टक्के हिस्सा १२३३.३४ कोटी रुपये असा एकूण ९८१.६५ कोटी रुपये निधी दिला आहे. त्यातून प्रकल्पाची ५५ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. मात्र, योजनेनुसार मनपाचा स्वनिधीचा ३० टक्के हिस्सा ८२२.२२ कोटी रुपये मनपा देऊ शकणार नाही, तो भार शासनाने उचलावा, अशी विनंती मनपाचे प्रशासक यांनी वेळोवेळी नगर प्रधान सचिवांना केली आहे. 

या आधीही दिले होते आदेशमनपाच्या विनंतीनुसार शासनाने ‘विशेष बाब’ म्हणून मनपाला निधी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश खंडपीठाने १३ जुलै २०२३ ला शासनाला दिले होते. असे असताना नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी गजानन आलेवाड यांनी ९ जानेवारी २०२४ रोजी शासन वरील निधी देऊ शकणार नाही. मनपाने १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून आणि स्वउत्पन्नातून ही रक्कम उभी करून प्रकल्पाच्या प्रगतीवर परिणाम होणार नाही याची दखल घेण्याचे कळविल्याचे मनपाचे वकील संभाजी टोपे यांनी निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ