शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करावा : खंडपीठ

By प्रभुदास पाटोळे | Updated: January 19, 2024 12:38 IST

तूर्तास शासनाने निधी देवून मनपाकडून टप्या टप्याने वसूल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी स्वत: मार्ग काढून योजनेनुसारचा छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठीचा मनपाचा स्वनिधीचा ३० टक्के हिस्सा ८२२.२२ कोटी रुपये शासनातर्फे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी गुरुवारी (दि.१८) दिले.

तूर्तास या निधीचा भार राज्य शासनाने उचलून महापालिकेकडून १०-२० वर्षांत अथवा शासन ठरवेल त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही रक्कम वसूल करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. या जनहित याचिकेवर १३ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. मुख्य सरकारी वकिलांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी स्वत: चर्चा करावी. त्यांना उच्च न्यायालयाच्या निधी संदर्भातील १३ जुलै २०२३ चे आदेश आणि महापालिकेचा निधी उभा करण्याबाबतची असमर्थता निदर्शनास आणून द्यावी. सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची परिस्थिती ‘समांतर’ सारखी होऊ नये. संभाजीनगरवासीयांना गेली २० वर्षांपासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. ६ ते ७ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो, हे खास निदर्शनास आणून द्यावे, असे खंडपीठाने सरकारी वकिलांना निर्देश दिले.

सदर पाणीपुरवठा योजोची सुधारित किंमत २७४०.७५ कोटी आहे. केंद्र शासनाने त्यांचा २५ टक्के हिस्सा ६८५.१९ कोटी रुपये व राज्य शासनाने त्यांचा ४५ टक्के हिस्सा १२३३.३४ कोटी रुपये असा एकूण ९८१.६५ कोटी रुपये निधी दिला आहे. त्यातून प्रकल्पाची ५५ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. मात्र, योजनेनुसार मनपाचा स्वनिधीचा ३० टक्के हिस्सा ८२२.२२ कोटी रुपये मनपा देऊ शकणार नाही, तो भार शासनाने उचलावा, अशी विनंती मनपाचे प्रशासक यांनी वेळोवेळी नगर प्रधान सचिवांना केली आहे. 

या आधीही दिले होते आदेशमनपाच्या विनंतीनुसार शासनाने ‘विशेष बाब’ म्हणून मनपाला निधी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश खंडपीठाने १३ जुलै २०२३ ला शासनाला दिले होते. असे असताना नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी गजानन आलेवाड यांनी ९ जानेवारी २०२४ रोजी शासन वरील निधी देऊ शकणार नाही. मनपाने १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून आणि स्वउत्पन्नातून ही रक्कम उभी करून प्रकल्पाच्या प्रगतीवर परिणाम होणार नाही याची दखल घेण्याचे कळविल्याचे मनपाचे वकील संभाजी टोपे यांनी निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ