शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 06:52 IST

Maharashtra News: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निवासी शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी संदर्भातील अपील संबंधित मंत्र्यांनी मंजूर केले होते.

छत्रपती संभाजीनगर : प्रशासकीय आदेशाद्वारे स्थापलेल्या ‘अर्धन्यायिक मंचा’द्वारे (क्वासी ज्युडिशिअल फोरम) यापुढे मंत्री आणि सचिवांनी कर्मचाऱ्यांबाबतचे न्यायनिवाडे देऊ नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी नुकतेच दिले. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निवासी शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी संदर्भातील अपील संबंधित मंत्र्यांनी मंजूर केले होते. त्याविरुद्ध संस्थेतर्फे दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने वरील आदेश दिले.  

युक्तिवादात काय म्हटले?

अर्धन्यायिक मंचाद्वारे न्यायनिवाडे देता येत नाहीत. त्यासाठी ‘कायद्यातच तशी तरतूद करणे आवश्यक’ आहे. सुनावणीअंती खंडपीठाने मंत्र्यांचा निकाल रद्द करून प्रतिवादी कर्मचाऱ्यांना शाळा न्यायाधिकरणाकडे चार आठवड्यांत अपील करायची मुभा दिली. 

काय होती याचिका?

मातोश्री सेवाभावी संस्थेने त्यांच्या निवासी शाळेतील ७ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी समाजकल्याण विभागाच्या उपसंचालकांकडे अपील दाखल केले, ते त्यांनी नामंजूर केले. 

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी खात्याच्या सचिवांकडे अपील दाखल केले. त्यांनीही ते नामंजूर केले. त्याविरुद्ध कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांकडे अपील दाखल केले. अर्धन्यायिक मंचाद्वारे मंत्र्यांनी हे अपील मंजूर केले होते.  

‘तो’ शासन निर्णय काय?

शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाद्वारे ३ ऑक्टोबर २०१७ रोजी निर्णय जारी करून विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विभागांतील शासन मान्यताप्राप्त अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा, विद्यानिकेतन यांतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे अथवा अन्यायाचे निवारण करण्यासाठी करावयाचे अपील व पुनर्विलोकनासाठी अशी अर्धन्यायिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण केली आहे. याद्वारे मंत्र्यांनी वरील कर्मचाऱ्यांचे अपील मंजूर केले होते.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्रीBeedबीड