शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

माझ्या पाठीशी ठाकरे ब्रॅंड, औरंगाबाद पश्चिममध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत: राजू शिंदे

By बापू सोळुंके | Updated: November 13, 2024 19:36 IST

गद्दारांना पराभूत करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे: राजू शिंदे

छत्रपती संभाजीनगर : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार ‘अनिवासी’ आमदाराला कंटाळले आहेत. मागील निवडणुकीत आपण अपक्ष होतो, तरीही जनतेने भरभरून मते दिली. आता ठाकरे ब्रॅंड माझ्या पाठीशी आहे. शिवाय गद्दारांना पराभूत करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, कारण ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे असा, दावा उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला.

प्रश्न - तुम्ही दोन वेळा या मतदारसंघात पराभूत झालात. आता विजय मिळेल, असे का वाटते?उत्तर - शंभर नाही, एक हजार टक्के मतदार आपल्याला संधी देतील, असा विश्वास आहे. कारण, मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार होतो, तरीही ४३ हजार मते मिळाली होती. आता मी मूळ शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही माझ्यासोबत आहे. शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी चंग बांधला आहे.

प्रश्न - तुम्ही भाजपमधून येऊन उमेदवारी मिळवली, त्यामुळे उद्धवसेनेतील इच्छुकांची नाराजी भोवणार नाही का?उत्तर - आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्रंदिवस माझ्यासोबत काम करीत आहेत. शिरसाट यांना चांगला पर्याय मिळाल्याने त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

प्रश्न - तुम्ही बाहेरचे उमेदवार असल्याचा आरोप होतोय?उत्तर - मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. मुंबईचा नाही. आमदार शिरसाट यांना मतदारसंघातील दहा लोकांची नावे अचूकपणे सांगून दाखवावी, असे आपले त्यांना आव्हान आहे. कारण, ते ‘अनिवासी’ आहेत. त्यांचा जनतेशी संपर्क तुटलेला आहे.

प्रश्न - लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिंदेसेनेला मताधिक्य मिळाले होते, ते कसे वळविणार?उत्तर - लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा भुमरे साहेबांना लाभ झाला होता. या निवडणुकीत मात्र तसे होणार नाही, कारण आमच्या पक्षाची एकगठ्ठा मते तर मिळणारच आहे. शिवाय, भाजपचा मोठा गट आपल्यासोबत आहे. जरांगे फॅक्टरही आपल्या बाजूने आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मते आपल्याला मिळतील. यामुळे या निवडणुकीत दीड लाखाहून अधिक मते घेऊन विजयी होऊ.

प्रश्न - आमदार संजय शिरसाट विकास कामांवर मते मागत आहेत, तुम्ही कशावर मागत आहात?उत्तर - शिरसाट यांनी स्वत:चा आणि कुटुंबाचा विकास केला, त्यांनी पंधरा वर्षांत कसला विकास केला? असा माझा त्यांना सवाल आहे, कारण सातारा, देवळाईत आजही ७० टक्के ड्रेनेज आणि रस्ते झाले नाही. नगरनाका ते दौलताबाद रस्ता चौपदरीकरण केला नाही, बजाजनगरात गुन्हेगारी वाढलेली आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम