शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

टीईटी पास हवेच ! परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक अपात्र ठरणार; ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:47 PM

यासंदर्भात सागर बहिरे व इतर अशा ८९ रिट याचिका खंडपीठात दाखल झालेल्या हाेत्या.

ठळक मुद्देटीईटी न दिलेल्या शिक्षकांना ३१ मार्च २०१९पर्यंत मुदतवाढ देण्यात आली हाेती.

औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी - टीचर इलिजिबिलिटी टेस्ट) आव्हान देणाऱ्या व उत्तीर्ण हाेण्यासाठी मुदतवाढीची मागणी करणाऱ्या ८९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी नुकत्याच फेटाळल्या. या निर्णयामुळे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेले प्राथमिक शिक्षक अपात्र ठरणार आहेत.

यासंदर्भात सागर बहिरे व इतर अशा ८९ रिट याचिका खंडपीठात दाखल झालेल्या हाेत्या. भारत सरकारच्या शिक्षणहक्क कायद्यान्वये (आरटीई) शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक आहे. टीईटी न दिलेल्या शिक्षकांना ३१ मार्च २०१९पर्यंत मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यानंतरही आणखी मुदतवाढ मागण्यासाठी आणि टीईटी परीक्षेलाच आव्हान देणाऱ्या याचिका खंडपीठात दाखल झाल्या हाेत्या.

याशिवाय महाराष्ट्र शासनानेही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण हाेण्यासाठी मुदतवाढ दिली. मात्र, ३१ मार्च २०१९ ही शेवटची तारीख परीक्षा उत्तीर्ण हाेण्यासाठी असेल, त्यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही, असे शासनानेही स्पष्ट केले होते. यासंदर्भाने आदेशही काढण्यात आला हाेता. या नाराजीतून अनेक शिक्षकांनी खंडपीठात याचिका दाखल केल्या हाेत्या. या प्रकरणात अंतरिम स्थगिती देण्यात आली हाेती. ज्याची मुदत अंतिम निकालापासून चार आठवडे राहील. मुदत संपताच आपाेआप अंतरिम स्थगिती संपुष्टात येईल, असे म्हटले होते. या प्रकरणाची सुनावणी २३ एप्रिल २०२१ राेजी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला हाेता. ११ जून राेजी खंडपीठाने निकाल घोषित केला. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अतुल. आर. काळे यांनी शासनातर्फे काम पाहिले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ