शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पावसाअभावी मराठवाडा मेटाकुटीला; औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत होतोय टँकरने पाणीपुरवठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:03 IST

यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे.

ठळक मुद्दे सरकार दरबारी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. सर्व मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा आहे.

औरंगाबाद : सरकार दरबारी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे. सर्व मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा आहे. सर्व बाजूंनी विभाग मेटाकुटीला आला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पुढील वर्षीचा उन्हाळा मराठवाड्यासाठी अतिशय भयावह ठरण्याची चिन्हे आहेत. २०१२ नंतर २०१५ सारख्या परिस्थितीचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर व जिल्ह्यात १५५ टँकरने १४५ गावांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. जालना जिल्ह्यात २१ टँकरने १५ गावांत पाणीपुरवठा होतो आहे. १८१ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. १६ विहिरींची त्यात वाढ झाली आहे. २२ गावे नव्याने टंचाईच्या यादीत आली आहेत. पावसाळ्यात अशी परिस्थिती असल्यामुळे पुढील काही महिन्यांत काय होईल, हे सांगणे अवघड आहे. ६३.४२ टक्क्यांवर मराठवाड्यातील पाऊस थांबला आहे. १ महिन्याचा खंड पडल्यामुळे विभागात टंचाई वाढली आहे. १०० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते. ३७ टक्के पावसाचा खंड पडला आहे. किमान सरासरीच्या तुलनेत ८१ टक्के तरी पाऊस होणे अपेक्षित होते. 

पावसाळ्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यात आजवर ६३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आजवर सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. मार्चमध्ये १५५ आत्महत्यांची नोंद होती. जून महिन्यात तो आकडा ४३३ वर गेला. जुलै महिन्यात ५२७ वर आत्महत्यांची नोंद झाली, तर सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ६१८ आत्महत्यांचा अहवाल शासनाकडे विभागीय आयुक्तालयाने पाठविला होता. २५ सप्टेंबरपर्यंत ६३६ आत्महत्यांची नोंद झाली. मागील १२ दिवसांत १८ आत्महत्या विभागात झाल्या. १ जून ते २५ सप्टेंबर या ११७ दिवसांत २०३ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला. पावसाळ्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे आकड्यांवरून दिसते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाचे नुकसान झाले. त्या तणावातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढला. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळWaterपाणी