शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी मराठवाडा मेटाकुटीला; औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत होतोय टँकरने पाणीपुरवठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:03 IST

यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे.

ठळक मुद्दे सरकार दरबारी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. सर्व मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा आहे.

औरंगाबाद : सरकार दरबारी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे. सर्व मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा आहे. सर्व बाजूंनी विभाग मेटाकुटीला आला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पुढील वर्षीचा उन्हाळा मराठवाड्यासाठी अतिशय भयावह ठरण्याची चिन्हे आहेत. २०१२ नंतर २०१५ सारख्या परिस्थितीचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर व जिल्ह्यात १५५ टँकरने १४५ गावांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. जालना जिल्ह्यात २१ टँकरने १५ गावांत पाणीपुरवठा होतो आहे. १८१ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. १६ विहिरींची त्यात वाढ झाली आहे. २२ गावे नव्याने टंचाईच्या यादीत आली आहेत. पावसाळ्यात अशी परिस्थिती असल्यामुळे पुढील काही महिन्यांत काय होईल, हे सांगणे अवघड आहे. ६३.४२ टक्क्यांवर मराठवाड्यातील पाऊस थांबला आहे. १ महिन्याचा खंड पडल्यामुळे विभागात टंचाई वाढली आहे. १०० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते. ३७ टक्के पावसाचा खंड पडला आहे. किमान सरासरीच्या तुलनेत ८१ टक्के तरी पाऊस होणे अपेक्षित होते. 

पावसाळ्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यात आजवर ६३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आजवर सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. मार्चमध्ये १५५ आत्महत्यांची नोंद होती. जून महिन्यात तो आकडा ४३३ वर गेला. जुलै महिन्यात ५२७ वर आत्महत्यांची नोंद झाली, तर सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ६१८ आत्महत्यांचा अहवाल शासनाकडे विभागीय आयुक्तालयाने पाठविला होता. २५ सप्टेंबरपर्यंत ६३६ आत्महत्यांची नोंद झाली. मागील १२ दिवसांत १८ आत्महत्या विभागात झाल्या. १ जून ते २५ सप्टेंबर या ११७ दिवसांत २०३ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला. पावसाळ्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे आकड्यांवरून दिसते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाचे नुकसान झाले. त्या तणावातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढला. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळWaterपाणी