शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सांगा, छत्रपती संभाजीनगरातून नव्या रेल्वे कधी? पीटलाइनच्या कामाची वर्षपूर्ती, तरी काम सुरूच 

By संतोष हिरेमठ | Published: April 10, 2024 6:11 PM

जालन्यातून नव्या रेल्वेची घोषणा, शहराला नवी रेल्वे मिळण्याची प्रतीक्षाच

छत्रपती संभाजीनगर : जालन्यात पीटलाइनचे काम पूर्ण होऊन उद्घाटनही झाले आणि उद्घाटनाला जालन्याहून नव्या रेल्वे सुरू करण्याची घोषणाही झाली. पण छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वे कधी सुरू होणार? असा सवाल प्रवासी विचारत आहेत. वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही पीटलाइनचे काम सुरूच आहे.

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना गेल्या ११ वर्षांत जवळपास सहा नव्या रेल्वे मिळाल्या. यात दररोज धावणाऱ्या दोनच रेल्वे आहेत. गेली अनेक वर्षे पीटलाइन नसल्याने नव्या रेल्वे सुरू करण्यात येत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीटलाइनची मागणी होत असताना जालन्यातही पीटलाइन मंजूर झाली. दोन्ही ठिकाणच्या पीटलाइनचे उद्घाटन एकाच दिवशी झाले. मात्र, जालन्याच्या पीटलाइनचे उद्घाटनही झाले आणि छत्रपती संभाजीनगरातील पीटलाइनचे काम अजूनही सुरू आहे. या पीटलाइनच्या कामाला सुरूवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले. जालन्यालाच प्राधान्यक्रम राहणार? पीटलाइन कधी पूर्ण होणार आणि नव्या रेल्वे कधी मिळणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जालन्यात पीटलाइन झाल्याने नव्या रेल्वे सुरू करण्यासाठी जालन्यालाच प्राधान्यक्रम राहणार का? असाही सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

गेल्या ११ वर्षांत सुरू झालेल्या रेल्वे- नगरसोल - चेन्नई एक्स्प्रेस (साप्ताहिक)- नांदेड - मुंबई सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस (दररोज)- मराठवाडा संपर्कक्रांती एक्स्प्रेस (साप्ताहिक)- छत्रपती संभाजीनगर - तिरूपती एक्स्प्रेस (साप्ताहिक)- छत्रपती संभाजीनगर - नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस (साप्ताहिक)- तिरूपती - शिर्डी एक्स्प्रेस (साप्ताहिक)- जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस

या रेल्वेंची मागणी: १. छत्रपती संभाजीनगर-नागपूर (परभणी-हिंगोली-अकोला-बडनेरा-वर्धा मार्गे). २. छत्रपती संभाजीनगर-गोवा (मनमाड-कल्याण-पनवेल-पेण-चिपळूण-वैभववाडी मार्गे). ३. छत्रपती संभाजीनगर - मैसूर (परभणी-लातूर-पंढरपूर-बेळगाव-हुबळी-बंगळुरू मार्गे). ४. छत्रपती संभाजीनगर-राजकोट (मनमाड-जळगाव-सूरत-बडोदा-अहमदाबाद-सुरेंद्रनगरमार्गे) ५. छत्रपती संभाजीनगर-रायचूर-छत्रपती संभाजीनगर.

रेल्वे प्रवास करणे अवघडछत्रपती संभाजीनगरहून नागपूर, गोवा यासह विविध ठिकाणांसाठी रेल्वे सुरू झाली पाहिजे. अद्यापही छत्रपती संभाजीनगरहून लातूर, धाराशिव, पंढरपूर दरम्यान रेल्वे संपर्क नाहीत. सध्या उन्हाळी सुट्टीत सर्व गाड्यांना दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. देवगिरी, नंदीग्राम, पुणे, पनवेल आदी रेल्वेंत महिनाभरापूर्वीदेखील आरक्षण तिकीट उपलब्ध होत नाही. उन्हाळी सुट्टीत पुणे, मुंबई, नागपूर, गोवा, बिकानेर, कन्याकुमारीपर्यंत जोडणारी नवीन रेल्वे चालविण्यात यावी.- अरुण मेघराज, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन