शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

इंधनात इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारातच; जुन्या पद्धतीनेच होते पेट्रोलपंपांची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 1:17 PM

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे दर सर्वत्र सारखेच असल्यामुळे मापात पाप होत आहे काय, इंधनाची घनता कशी आहे, त्यात पाण्याची भेसळ आहे की नाही. फिल्टर केल्यानंतर इंधनाची गुणवत्ता कशी आहे.एवढ्याच मुद्यांचे पुरवठा विभाग जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार परीक्षण करून त्याचा अहवाल तयार करीत आहे. 

औरंगाबाद : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत. दर सर्वत्र सारखेच असल्यामुळे मापात पाप होत आहे काय, इंधनाची घनता कशी आहे, त्यात पाण्याची भेसळ आहे की नाही. फिल्टर केल्यानंतर इंधनाची गुणवत्ता कशी आहे. एवढ्याच मुद्यांचे पुरवठा विभाग जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार परीक्षण करून त्याचा अहवाल तयार करीत आहे. 

शहरातील बहुतांश पेट्रोलपंपांवर दुचाकीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर त्यामध्ये पाणी निघण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे दुचाकी वाहने बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे पेट्रोलपंपचालकांनी देखील हात टेकल्याचे वक्तव्य करून कंपन्यांकडे बोट दाखविले. गेल्या आठवड्यात पुरवठा विभागाने अचानक ६ पंप तपासले. त्यापैकी एकाही पंपामध्ये भेसळ आढळून आलेली नाही. तसेच कुठेही इंधनात पाणी आढळून आले नाही. 

टाक्या रोटेशननुसार स्वच्छ करतात इंधनासाठी वापरण्यात येणार्‍या टाक्या स्वच्छ करण्यासाठी त्याचे रोटेशन कंपनी प्रतिनिधी, वजनमापे विभाग, उपसा मशीन पुरवठा कंपनी प्रतिनिधी व मालकाच्या उपस्थितीत करावे लागते.  रोटेशन ठरलेले असते. त्यातही डेडस्टॉक  हा उपसल्या जात नाही. १० ते १२ वर्षांपूर्वी डेडस्टॉक विक्रीसाठी पुरवठा विभागाची परवानगी घेतली जायची. सद्य: पेट्रोलपंपांची संख्या वाढल्यामुळे परवानगी घेतली जात नाही. 

पुरवठा अधिकार्‍यांचे मत असे -पुरवठा अधिकारी डॉ.भारत कदम म्हणाले, पुरवठा विभागाला  इंधनाचे माप, घनता, पाणी, फि ल्टर आणि दर तपासण्याचे अधिकार आहेत. इथेनॉल मिश्रण हे तांत्रिक बाब आहे. त्याच्या मिश्रणाबाबत पुरवठा विभागापर्यंत काहीही माहिती आलेली नाही. शिवाय हा केंद्र शासनाचा निर्णय आहे. 

पेट्रोल कंपन्यांचे मुख्यालय तिकडेच असून, सेल्स आॅफिसरदेखील कंपनी मुख्यालयाच्या संपर्कात असतात. शहरी भागातच पेट्रोलमध्ये पाणी मिश्रण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ग्रामीण भागातून आजवर एकही तक्रार आली नसल्याचा दावा कदम यांनी केला.

इथेनॉलचे पाणी होत असेल, तर सर्व पेट्रोलपंपांबाबत तक्रारी आल्या पाहिजेत. ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. किमान दोन लिटर पेट्रोल घेऊन त्यांची पावती ग्राहकांनी घ्यावी. त्यानंतर जर वाहनातील इंधनात पाणी निघाले तर तक्रार करून संबंधित पंपचालकावर गुन्हा दाखल करता येईल.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपAurangabadऔरंगाबाद