‘त्या’ शिक्षकाने रचले होते अपहरणाचे कुंभाड
By Admin | Updated: February 9, 2015 00:46 IST2015-02-09T00:25:32+5:302015-02-09T00:46:06+5:30
केज : १२ जानेवारी रोजी शाळेतून परतताना एका शिक्षकाचे अपहरण झाल्याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या शिक्षकाचे अपहरण झाले नव्हते

‘त्या’ शिक्षकाने रचले होते अपहरणाचे कुंभाड
केज : १२ जानेवारी रोजी शाळेतून परतताना एका शिक्षकाचे अपहरण झाल्याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या शिक्षकाचे अपहरण झाले नव्हते तर त्याने तसा बनाव केला होता, असे तपासात रविवारी समोर आले. धक्कादायक हे की, तो एका तरुणाच्या खूनातील आरोपी निघाला.
शिवाजी बापू गायकवाड (रा. घाटेवाडी, ता. केज) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. आसाराम सिताराम हलकडे (वय ३०, रा. घाटेवाडी) हे २० डिसेंबर २०१४ रोजी विडा येथील आठवडी बाजारात आले होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार केज ठाण्यात दिली होती. २९ डिसेंबर रोजी शिंदी शिवारात एका विहिरीमध्ये त्यांचे प्रेत आढळून आले. त्यानंतर १२ जानेवारी २०१५ रोजी शिक्षक गायकवाड याने विडा सांगवी रस्त्यावर स्वत:ची कार बेवारस सोडून अपहरणाचे नाट्य केले होते. नातेवाईकांनी गावातीलच काही संशयितांविरूद्ध केज ठाण्यात गुन्हाही नोंद केला होता.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली तेव्हा गायकवाड याचे अपहरण नव्हे तर बनाव केल्याचे समोर आले. आसाराम हलकडे याच्या खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले.
आसाराम याला नेमक्या कुठल्या कारणावरून संपविले हे अद्याप समोर आले नाही. (वार्ताहर)
मयत आसारामचे वडिल सीताराम हलकडे यांच्या फिर्यादीवरून खंडू लिंबा हलकडे, लिंबा भानुदास हलकडे, विलास अच्युत आरडे, अच्युत ज्योतिबा आरडे, अशोक बाजीराव गायकवाड, शिक्षक शिवाजी बापूराव गायकवाड यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाचही आरोपी गजाआड असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.