शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुंबईच्या धर्तीवर करमाफी अशक्य, निर्णय झाला तर शहरातील ८० टक्के मालमत्ता करमुक्त होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 13:27 IST

Aurangabad Municipal Corporation : मालमत्ता कर माफ होणे अशक्य असल्याचे शहरातील करमूल्य निर्धारण तज्ज्ञांची मते

औरंगाबाद : मुंबई, नवी मुंबई येथे ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ताधारकांकडून महापालिका कर वसूल करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादेतही कर माफ होऊ शकतो, असे संकेत पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai ) यांनी सोमवारी दिले. मात्र, असा निर्णय होणे कठीण असून औरंगाबादेत ५०० चौरस फुटांपर्यंत कर माफी द्यायची असले तर ८० टक्के मालमत्ता करमुक्त होतील. महापालिकेला (Aurangabad Municipal Corporation) आर्थिकदृष्ट्या हे अजिबात परवडणारेही नाही. हा तोटा शासन भरून देणार का? असा प्रश्न करमूल्य निर्धारण विभागातील निवृत्त अधिकारी व करसल्लागारांनी उपस्थित केला आहे.

महापालिकांनी स्वत:चे आर्थिक स्त्रोत मजबूत करावेत, मालमत्ता कर, पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करावी असा दंडकच शासनाने घालून दिला आहे. आता अचानक शासनच मालमत्ता कर माफ करणार असेल तर महापालिका दिवाळखोरीत निघतील, अशी भीती अधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली. औरंगाबाद महापालिकेच्या रेकॉर्डवर २ लाख ८० हजार मालमत्ता आहेत. त्यातील ३० हजार मालमत्ता व्यावसायिक आहेत. शहरात २० बाय ३० आकाराच्या मालमत्ता सर्वाधिक आहेत. त्यांना कर लावताना नियमांनुसार जिना, शौचालयाचे बांधकाम मोजले जात नाही. त्यामुळे ५०० चौरस फुटांत या मालमत्ता मोडतात. त्याचप्रमाणे वन बीएचके, टू बीएचके फ्लॅटही ५०० चौरस फुटांत येतात. त्यांनाही वगळायचे म्हटले तर ८० टक्के मालमत्तांना करच लागणार नाही. उर्वरित २० टक्केच मालमत्ताधारकांकडून मनपाला कर वसूल करावा लागेल. उर्वरित मालमत्ताधारकांनीही उद्या आम्हाला पण कर माफ करा म्हटले तर? अशी भीती मनपा अधिकारी व्यक्त करीत आहेत.

१० कोटींचा खर्चमहापालिका स्मार्ट सिटीअंतर्गंत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करत आहे. ज्या मालमत्तांना आजपर्यंत कर लागला नाही, त्यांना कर लावण्यात येणार आहे. वाढीव बांधकाम असलेल्या मालमत्तांना सुधारित कर लावला जाईल. या कामासाठी स्मार्ट सिटीतून तब्बल १० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मालमत्ता करच माफ करायचा असेल तर १० काेटींच्या खर्चावर पाणी सोडावे लागेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरSubhash Desaiसुभाष देसाई