शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'चटणी-भाकरी सोबत घ्या', २० जानेवारीला समाज बांधवांसह जरांगे पाटील मुंबईकडे पायी निघणार

By बापू सोळुंके | Updated: December 26, 2023 17:20 IST

सुमारे दहा लाख वाहनांतून समाज बांधव सोबत चटणी, भाकर घेऊन सहभागी होतील

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज कुणबी असल्याच्या एवढ्या मोठ्या नोंदी सापडल्या आहेत, आता या नोंदीचा आधार घेऊन राज्यसरकारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले पाहिजे, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, यासाठी मी २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईला पायी निघणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत चर्चा केली.

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  सरकारणे सांगितलं कायदा पारित करायला वेळ द्या, आम्ही नोंदी  कायदा पारित करायला ४० दिवस दिले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. अनेकदा सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे. यादीत क्रमांक ८३ ला तत्सम मराठा म्हणून उल्लेख आहे. परंतु सरकारकडून जाणून बुजून चालढकल करायचं काम सुरू असल्याचे दिसते. केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी आम्हाला आजपर्यंत आरक्षण दिले नाही. सर्वोच्च न्यायालयातून जुने आरक्षण मिळाले तरी ते आम्ही घेणारच आहोत. कारण ते आरक्षण आंदोलनातूनच मराठा समाजाला मिळाले होते. 

आमच्यावर कोयते, कुऱ्हाडी काढणारे संस्कृती काय संस्कृती शिकवताओबीसी नेते तथा राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेता जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका आमच्यावर कोयते ,कुऱ्हाडी काढण्याची भाषा करणारे मला संस्कृतीची भाषा काय शिकवणार? असा सवाल केला.  धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका  स्पष्ट करा म्हटल्यांवर कागद खाईल हा माणूस असेही जरांगे म्हणाले.

मीठ, मिरची सोबत घेऊन आपआपल्या वाहनांनी मुंबईला जायचे२० जानेवारी रोजी मुंबईला निघायचे आहे. मुंबईला निघताना प्रत्येक गावकऱ्यांनी स्वत:च्या जेवणाची   व्यवस्था करावी, यासाठी मीठ, मिरची सोबत घ्यावी,असे आवाहन जरांगे पाटील  यांनी समाजाला केले.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली भेटस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास जरांगे पाटील यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद