शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"

By बापू सोळुंके | Updated: July 7, 2024 19:36 IST

उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला फॉर्म्युला.

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, अशा परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे. आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा ठराव विधिमंडळात घ्या आणि लोकसभेत पाठवा. दोन्ही ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो,’ अशा शब्दात उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारला पर्याय दिला.

बीड बायपासवर रविवारी उद्धवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, शिवसेना सरचिटणीस विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी उद्धवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख, पदाधिकाऱ्यांपासून ते गटप्रमुखांपर्यंत, कार्यकर्ते, शिवसेनेचे सरपंच आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, ‘मी येथे आरक्षणावर बोलणार आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कृपा करून आपसात भांडू नका, असे आवाहन करत मराठा, धनगर, ओबीसी आणि मुस्लिम या सर्व जातींच्या न्याय्य मागण्या सोडविण्यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे. आपसात भांडून, घरे जाळून न्याय मिळणार नाही, तर एकत्र येऊन महाराष्ट्राला ताकद दाखवून द्या,’ असे आवाहन त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला केले.

जरांगे पाटील आणि हाके हे उपोषण करून स्वत:च्या जिवाशी खेळत असतात. यामुळे जरांगे आणि हाके यांच्यासह दोन्ही समाजातील प्रतिष्ठित लोकांना बोलवा आणि तोडगा काढा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. ५२ टक्के आरक्षणाची मर्यादा ठरलेली आहे. मर्यादेबाहेर यापूर्वी दिलेले आरक्षण टिकले नाही. बिहार राज्यातील आरक्षणही असेच उडाले आहे. यामुळे सर्व समाजाला सामावून घेण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढविणे केंद्र सरकारच्या हातात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा ठराव विधिमंडळात घ्यावा आणि लोकसभेत पाठवावा. आम्ही तुम्हाला दोन्ही ठिकाणी पाठिंबा देतो, अशी ग्वाही देत ठाकरे यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा पर्याय सुचवला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद