शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या मागणीसाठी गाठले तहसील कार्यालय

By admin | Updated: July 19, 2014 00:39 IST

पालम : तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. श्ोतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा

पालम : तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. श्ोतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी खा. सुरेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी व सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून कैफियत मांडली आहे.
पालम तालुक्यात अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही. अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी उरकून घेतली आहे. पेरणीनंतर पाऊस उघडल्याने हजारो रुपये खर्चून पेरणी पूर्णत: वाया गेली आहे. उगवलेली कवळी रोपे पाण्याअभावी वाळून जात आहेत. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतावरील शेतसारा माफ करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, भारनियमन बंद करावे, बँकांची व सावकाराची कर्ज वसुली थांबवावी, गारपीटग्रस्त वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांचे स्थलांतर थांबवावे, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, दुबार पेरणीसाठी बियाणे व रासानिक खताचा पुरवठा करावा, बोगस बियाणांची विक्री थांबवावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. भगवान आगे यांना देण्यात आले आहेत.
प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी खा. सुरेश जाधव, प्रभाकरराव सिरस्कर, दत्तराव जवळेकर, अ‍ॅड. विजयकुमार शिंदे, अ‍ॅड. सुनील देशपांडे, पं.स. सदस्य नामदेव कदम, बंडू जाधव, किशोर कदम, सुभाष जाधव, भीमराव इतनर, माधव निळे, मन्मथ काळे, भारत इतनर, लिंबाजी पौळ आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे
पालम तालुक्यात अजूनही पाऊस झालेला नाही. मध्यंतरी हलकासा पाऊस झाला होता. पाऊस पडेल या आश्ोने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु दररोज आता आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणांवर केलेला खर्च बियाणे न उगविण्याची भिती यासह विविध समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या आहेत. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी वाईट प्रसंग ओढवल्याची माहिती दिली.