शासकीय कार्यालयांमध्ये बदल्यांचे सत्र
By Admin | Updated: June 2, 2014 01:34 IST2014-06-02T01:24:41+5:302014-06-02T01:34:12+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या ३१ मेपूर्वीच कराव्यात, असे नियम केले आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये बदल्यांचे सत्र
औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या ३१ मेपूर्वीच कराव्यात, असे नियम केले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या १९६ अधिकारी कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश ३१ मे रोजी रात्री ८.३० वाजता जारी केले. बदल्या करताना प्रशासकीय कामकाज सोयीचे कसे होईल आणि जनतेची कामे मार्गी कसे लागतील हे पाहिले जाते. बदल्यांमध्ये घोळ होऊ नये, यासाठी आरोग्य संचालकांनी बदल्यांसाठी पात्र कर्मचार्यांची यादी घेऊन आरोग्य उपसंचालक, मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपिक यांना मुंबईला बोलवले होते. त्यानुसार हे अधिकारी दोन दिवस मुंबईत मुक्काम ठोकून होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजता १९६ अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले. या बदल्यांमध्ये ६५ अधिपरिचारिका, २१ अधिसेविका, १९ कनिष्ठ लिपिक, १६ औषधनिर्माता अधिकारी यांच्यासह अन्य तांत्रिक कर्मचार्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या मराठवाड्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने आज बदल्यांचे आदेश जारी केले. आर. एम. साळोख यांची औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात नगर परिषद प्रशासन विभागात बदली झाली आहे. केज तहसीलमधील पी. डी. पुरी यांची बदली शिरूर अनंतपाळ येथे, के. एच. जगरवाल यांची गेवराई तहसील येथून पाटोदा येथे, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बी. पी. पन्हाळे यांची महसूल शाखेतून याच ठिकाणी रोहयो शाखेत, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पी. बी. यंदे यांची पुरवठा विभागातून याच ठिकाणी रोहयो शाखेत, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील पी. डी. जाधव यांची लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात, बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील लक्ष्मण धस यांची परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात, एस. सी. पाचपुते यांची माजलगाव तहसील कार्यालयातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात, के. पी. नरवडे यांची परतूर तहसील कार्यालयातून सिल्लोड तहसील कार्यालयात, शिवानंद बिडवे यांची उस्मानाबाद जिल्ह्यातून औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात, व्ही. डी. पाटोळे यांची सोनपेठ येथून मंठा तहसील कार्यालयात, पी. बी. सिरसेवाड यांची माजलगाव येथून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात, डी. बी. कोरडे यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून वैजापूर येथे आणि डी. के. संतपाळ यांची वैजापूर येथून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.