शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संशय अन् रागाने केला घात; क्लासमेटसोबत दिसल्यामुळे तरुणीस एकतर्फी प्रेम करणाऱ्याने संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:43 IST

पाच मिनिटे बोलायचे असल्याची शपथ देऊन तरुणीला कॅफेबाहेर आणले आणि केले चाकूने वार

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत ऊर्फ कशीश ही तीन मित्र आणि मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी गेली असता, तिला पाहण्यासाठी आलेल्या शरणसिंग सेठी याने संशयातून पाच मिनिटे बोलायचे असल्याची शपथ देऊन कॅफेबाहेर आणले. बाहेर येताच त्याने ‘मेरी नहीं हो सकती तो किसी की भी नहीं हो सकती’ या डायलॉगप्रमाणे २०० फूट ओढत नेऊन गळा चिरला. गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांच्या मदतीने शरणसिंग सेठीला (२०) चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या.

देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या सुखप्रीत ऊर्फ कशीश कौर प्रीतपालसिंग ग्रंथी (१८) या विद्यार्थिनीची रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शनिवारी दुपारी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यामुळे शहरासह राज्य हादरून गेले होते. आरोपीला गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तो कशीशवर मागील पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. तो दहावी नापास झाल्यानंतर गॅरेजवर कामाला लागला. कशीशने बारावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात बीबीएला प्रवेश घेतला. महाविद्यालयात ती मित्र-मैत्रिणींसोबत राहायची. 

शरणला त्याच्या मित्राने कशीशची मैत्री तीन मुलांसोबत जमली असून, तुला आता ती मिळणार नसल्याचे सांगितले. तो तिच्यावर सतत पाळत ठेवून होता. महाविद्यालयात जाऊन तिची चौकशी करण्याचा प्रयत्न करीत होता. शनिवारीही कशीश महाविद्यालयात आल्यानंतर तो तिच्या मागेच आला. महाविद्यालयाच्या गेटबाहेरील एका कॅफेमध्ये कशीश तीन मित्र आणि मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी गेली होती. तो मागेच आला. कशीशचे त्या तीन मुलांसोबत प्रकरण असल्याचा त्याला संशय होता. या संशयातूनच त्याने कशीशला शपथ घालून पाच मिनिटे बाेलायचे असल्याचा बहाणा करून कॅफेबाहेर बाेलावून घेतले. 

कशीश बाहेर आल्यानंतर त्याने तिच्यावर संशय व्यक्त केला. तेव्हा तिने त्यास नकार देत निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे त्याने तिला कॅफेसमोरच २०० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या दिशेने ओढत नेले. माझी होऊ शकत नाहीस तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत सोबत असलेल्या हत्याराने तिच्यावर १८ वार केल्याची माहिती शरणने पोलिसांना दिली.

असा पोहोचला लासलगावलाशरणने कशीशचा खून केल्यानंतर, दुचाकी कॅफेसमोर सोडून पळ काढला. शरणला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आणि वेदांतनगरचे निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वात प्रत्येकी दोन पथके तैनात होती. शरणने पायी चालतच माळीवाडा भागातून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग गाठला. महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमध्ये बसून त्याने ट्रक बदलत लासलगाव गाठले. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल मस्के यांचे पथक शरणची बहीण असलेल्या लासलगावात शनिवारी सायंकाळीच पोहोचले. पथकाने बहिणीसह तिच्या पतीला शरण आल्यानंतर कळविण्यास सांगितले. शरण मनमाडच्या दिशेने जाऊ शकतो, असा संशय असल्यामुळे पथक मनमाडला रात्री गेले. त्याठिकाणी गुरुद्वारामध्ये शरण आल्यास माहिती देण्यास सांगितले. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शरणसिंग बहिणीच्या घरी पोहोचला. याची माहिती समजताच लासलगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. तोपर्यंत गुन्हे शाखेचे पथकही पोहोचले होते. या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला औरंगाबादेत आणले.

शरण पोहोचताच भाऊजींनी कळवलेशरण बहिणीच्या घरी आल्यानंतर त्याच्या भाऊजींनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकास कळविले. तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास थांबवून ठेवण्याच्या सूचना केल्या. मात्र, तो तेथून पसार होण्याची घाई करीत असल्यामुळे स्थानिक पोलिसांना बोलावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

शरण गुन्हेगारी प्रवृत्तीचाशरणसिंग हा शीघ्रकोपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानपुरा भागातील काही गुंडांसोबतही त्याची ऊठबस होती. तसेच तो गॅरेजवर कामाला असताना नशापाणी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारघाटी महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यानंतर हरप्रीतसिंग कौर उर्फ कशीशचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर प्रतापनगर येथील स्मशानभूमीत कशीशवर दुपारी तीन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खा. इम्तियाज जलील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाठ, आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद