शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

औरंगाबादेत सूर्य ओकतोय आग; उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:01 PM

उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.

ठळक मुद्दे लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे.. रविवारी (दि.२९) औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर पोहोचला.

औरंगाबाद : लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. रविवारी (दि.२९) औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर पोहोचला. हा पारा येत्या आठवडाभरात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.

राज्यासह औरंगाबादचे तापमान मागील आठ दिवसांपासून चांगलेच तापत आहे. रविवारी या तापमानाने ४१ अंश गाठला. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. भर दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत असल्याचे रविवारी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असतानाही नागरिकांनी घरीच बसून राहणे पसंद केले. यातच रविवारी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र, या कार्यक्रमांकडेही रसिक, अभ्यासकांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. उन्हाच्या तडक्यातून वाचण्यासाठी मोटारसायकलस्वार डोक्यावर हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. उन्हाचा पारा चढल्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांत वीज गुल होत आहे. याचा परिणाम नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.

वीज गुल, अनेक भागांत अंधारसूतगिरी भागातील सबस्टेशनमधील तांत्रिक दोषाने रविवारी रात्री परिसरातील अनेक भागात वीज गुल झाली. रात्री ८.१४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंतही सुरळीत झाला नव्हता. परिणामी, उकाड्याने नागरिक हैराण झाले    होते. 

नागरिक शोधताहेत थंड ठिकाणेशहरात काही कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक उन्हाचा चटका सहन केल्यानंतर थंड होण्यासाठी रसवंतीगृह, शीतपेयाची ठिकाणे शोधत आहेत. ज्याठिकाणी थंड पेयाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या निवासांमध्येही उकाड्यामुळे एसी, पंखा, कूलरची चांगलीच मागणी वाढली आहे.

सिडको एन-२ परिसरात वीजपुरवठा खंडितशहरातील सिडको एन-२ परिसरात रविवारी सुटीच्या दिवशी तब्बल १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, तर आग ओकणारा सूर्य आणि घरातील गायब झालेली वीज यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागला. 

टॅग्स :Healthआरोग्यenvironmentपर्यावरणtourismपर्यटन