शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कृषीकन्यांची भरारी! एकाच गावच्या तिघी झाल्या पोलीस, पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 16:30 IST

गावकऱ्यांनी केला जल्लोष, ग्रामपंचायत कार्यालयात तिघींचा सत्कार करण्यात आला

- रऊफ शेखफुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील कान्होरी गावातील तीन मुलींची नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या तिघी जिवलग मैत्रिणी आहेत. तिन्ही शेतकरी कन्येने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवत पोलीस होण्याचे स्वप्न साकार केल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. या अभिमानास्पद कामगिरीमुळे ग्रामस्थांच्यावतीने तिघींचाही सत्कार करण्यात आला.

सोनाली रामराव म्हस्के, ज्योती मानसिंग बारवाल आणि दुर्गा सुरेश म्हस्के अशी तिघींची नाव आहेत. कान्होरी गावात राहून पोलीस होण्याचे स्वप्न तिघींनी पाहिले. हे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने सराव सुरु केला. सोबतच खाजगी शिकवणी लावली. तिघीही अत्यंत गरीब घरातील असून परिस्थिती बदलायचा निश्चय करून त्यांनी पोलीस होण्याचे ठरवलं. अखेर जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांची पोलिस विभागात निवड झाली. सोनाली रामराव म्हस्केची अकोला, ज्योती मानसिंग बारवालची ठाणे तर   दुर्गा सुरेश म्हस्केची रायगड येथे निवड झाली आहे. 

मेहनतीला यश, पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रूशालेय जीवनापासूनच पोलीस होण्याचे स्वप्न होते. कॉलेज होताच थेट भरतीची तयारी केली. मेहनतीला यश आल्याने आनंद होत असल्याच्या भावना यावेळी तिघींनी व्यक्त केल्या. दरम्यान, तिघींच्या पालकांकडे जेमतेम शेती आहे. शेतीवर उदरनिर्वाह होत नसल्याने ते मजुरी देखील करतात. मुली पोलीस झाल्याचे कळताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. 

ग्रामस्थांनी पालकांसह केला सत्कार तिघींना सरकारी नोकरी लागल्याचे कळताच गावात आनंदाचे वातावरण आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल गावकऱ्यांनी तिन्ही मुलींचा पालकांसह सत्कार केला. यावेळी सरपंच कांताबाई म्हस्के, उपसरपंच बापुराव म्हस्के, बाळू साळवे, महादू आहेर, अशोक वखरे, हरी म्हस्के, कल्याण डांगर, अंबादास जाधव, सोमीनाथ लगड, साहेबराव म्हस्के, संतोष सोटम, देवलाल राजपूत, मधुकर साळवे, श्रीराम म्हस्के, भरत ठोकळ, सुमित साळवे, विजय बारवाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसEducationशिक्षणFarmerशेतकरी