शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विद्यार्थ्यांना मिळणार तीन दिवस दूध, अंडी, फळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:58 PM

औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.

ठळक मुद्देशाळा : दुष्काळामध्ये मध्यान्ह भोजन योजनेत सुधारणा

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.जिल्ह्यात सध्या उन्हाळी सुट्टीत जवळपास २०० जि. प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना लगेच आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी व फळे देण्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानंतरही १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडे, फळे देण्याची ही योजना कायम सुरू ठेवली जाणार आहे. जि. प. शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी वर्गात शिकणाऱ्या दुष्काळी अथवा टंचाईसदृश भागातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर शालेय पोषण आहारात योजनेंतर्गत तीन दिवस पूरक आहार देण्यासाठी आठवड्याला प्रतिविद्यार्थी १५ रुपये निधी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.दरम्यान, या योजनेचे स्वागत शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, शरद शहापूरकर, विनोद पवार, मच्छिंद्र भराडे, किशोर कदम, मीरा जाधव, शगुफ्ता फारुकी, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत आदींनी केले आहे. पूरक आहारासाठी झालेला खर्च मुख्याध्यापकांना, बचत गटांना किंवा संबंधित यंत्रणेला अग्रीम स्वरूपात नियमितपणे देण्यात यावा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.------------

 

टॅग्स :Aurangabad Educational Officerऔरंगाबाद शिक्षणाधिकारीSchoolशाळा