शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

तांत्रिक अडचणीने विद्यार्थ्यांची ‘सत्त्व’ परीक्षा; त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठाने दिली तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 7:52 PM

पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही.

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेत उडालेला तांत्रिक गोंधळ थांबणार आहे की नाही. तुमच्यामुळे विद्यापीठाची जनसामान्यांमध्ये बदनामी होत आहे. यापुढे तांत्रिक अडचणीची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, या शब्दांत परीक्षा घेणाऱ्या त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठ प्रशासनाने चांगलेच खडसावले. तरीही शुक्रवारी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला; पण त्याचे प्रमाण कमी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ९ ऑक्टोबरपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना पेपरची लिंक ओपन झाली नाही. लिंक ओपन झाली, तर दुसऱ्याच विषयाचा पेपर स्क्रीनवर यायचा. सकाळच्या सत्रात ६० प्रश्न, तर दुपारच्या सत्रात ३० प्रश्न, अनेक प्रश्न तसेच पर्यायी उत्तरे चुकीची, कधी कधी रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन पेपर डाऊनलोड होत नसत. या सर्व प्रकारांमुळे परीक्षार्थी हतबल झाले आहेत. 

दरम्यान, विद्यापीठाने पहिल्यांदाच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले असून, ही परीक्षा त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेतली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने या यंत्रणेला शुक्रवारी चांगलीच तंबी दिली असून, यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही पाहिजेत. गरज पडल्यास सर्व्हर हाताळण्यासाठी मनुष्यबळ वाढवा, अशा सूचनाही केल्या. त्यानुसार सदरील यंत्रणेने मनुष्यबळ वाढवून येणाऱ्या तांत्रिक अडचणीही सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आज काही प्रमाणात लिंक उशिरा ओपन होणे, ऑफलाईन पेपर लवकर डाऊनलोड न होणे, अशा तक्रारी आल्या.

विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाहीयुवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. तुकाराम सराफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संकेत कांबळे, रोहित जोगदंड, कपिल वानखेडे, राहुल कांबळे आदींनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. परीक्षेतील गोंधळ थांबवाविद्यापीठाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घ्यावी लागेल; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा दिला. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले म्हणाले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा