पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण

By Admin | Updated: December 19, 2014 00:57 IST2014-12-19T00:53:05+5:302014-12-19T00:57:40+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाने उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे.

Strengthening of water sources | पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण

पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण


लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाने उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. शिवाय, आहे त्या पाण्याच्या बळकटीकरणासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बुडक्या घेणे, चर खोदणे, नवीन विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सर्व्हेक्षण करीत आहे.
भूवैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार नवीन विंधन विहिरी घेण्यात येत असून, जिथे पाणीपातळी घटली आहे, तिथे विंधन विहिरी न घेता जिथे पाणीपातळी बऱ्यापैकी आहे अशा ठिकाणीच विंधन विहिरींना परवानगी दिली जात आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांचा अभिप्राय घेतला जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाने सहामाही पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. २५.५ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यातून विंधन विहिरी घेणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, खाजगी स्त्रोतांचे अधिग्रहण करणे आदी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५५८ गावे व १२० तांड्यांवरील टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)४
१ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या निवारणासाठी हा कृती आराखडा असून, जिल्ह्यातील ९४३ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार नाही, याची काळजी या कृती आराखड्यात घेण्यात आली आहे. जुन्या योजनांची दुरुस्ती, नव्या योजनांना विशेष म्हणून मंजुरी देण्यासाठी या कृती आराखड्यात प्रस्ताव घेतले जाणार आहेत.

Web Title: Strengthening of water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.