शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उपमहापौरपदासाठी सर्वच पक्षांची रणनीती; १४ जणांनी घेतले २९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:56 IST

शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ‘एमआयएम’ने घेतले अर्ज

ठळक मुद्दे३१ डिसेंबरला होणार निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधवारपर्यंत काही ठरलेले नव्हते.

औरंगाबाद : भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, गुरुवारी १४ जणांनी २९ उमेदवारी अर्ज घेतले. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.

भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. भाजपसोबत गजानन बारवाल यांची अपक्ष आघाडी आहे. गजानन बारवाल यांना गुरुवारी ४ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले. शिवसेनेचे बन्सी जाधव यांनीही ४ अर्ज घेतले. काँग्रेसचे अफसर खान (२ अर्ज), रेशमा अशफाक कुरेशी (२), भाऊसाहेब जगताप (२), खान अय्युब म. हुसेन खान (१), शबनम बेगम कलीम कुरेशी (१), राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता विधाते (२), परवीन खैसर खान (२), मुल्ला सलिमा बेगम खाजोद्दीन (२) यांनीही अर्ज घेतले. याबरोबरच एमआयएमचे गंगाधर ढगे (२), अब्दुल रहीम शेख नाईकवाडी (२) यांच्यासह अपक्ष जोहराबी नासेर खान (२), रमेश जायभाय (१) यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज घेतले. 

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधवारपर्यंत काही ठरलेले नव्हते. शिवसेना स्वत: निवडणूक लढणार का? याकडे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदासाठी अर्ज घेतले. अर्ज वितरणानंतर आता शुक्रवारी (दि.२७) अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या दिवशी किती जण अर्ज दाखल करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

कोणत्या पक्षाचा होणार उपमहापौर?राज्यात बदलेल्या परिस्थितीमुळे उपमहापौरपदासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसते. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे उपमहापौरपद शिवसेनेकडे राहील, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही दिसते. या सगळ्यात नेमके कोणत्या पक्षाचा उपमहापौर होणार, हे ३१ डिसेंबर रोजीच स्पष्ट होईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस