शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

उपमहापौरपदासाठी सर्वच पक्षांची रणनीती; १४ जणांनी घेतले २९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:56 IST

शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ‘एमआयएम’ने घेतले अर्ज

ठळक मुद्दे३१ डिसेंबरला होणार निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधवारपर्यंत काही ठरलेले नव्हते.

औरंगाबाद : भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, गुरुवारी १४ जणांनी २९ उमेदवारी अर्ज घेतले. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.

भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. भाजपसोबत गजानन बारवाल यांची अपक्ष आघाडी आहे. गजानन बारवाल यांना गुरुवारी ४ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले. शिवसेनेचे बन्सी जाधव यांनीही ४ अर्ज घेतले. काँग्रेसचे अफसर खान (२ अर्ज), रेशमा अशफाक कुरेशी (२), भाऊसाहेब जगताप (२), खान अय्युब म. हुसेन खान (१), शबनम बेगम कलीम कुरेशी (१), राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता विधाते (२), परवीन खैसर खान (२), मुल्ला सलिमा बेगम खाजोद्दीन (२) यांनीही अर्ज घेतले. याबरोबरच एमआयएमचे गंगाधर ढगे (२), अब्दुल रहीम शेख नाईकवाडी (२) यांच्यासह अपक्ष जोहराबी नासेर खान (२), रमेश जायभाय (१) यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज घेतले. 

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधवारपर्यंत काही ठरलेले नव्हते. शिवसेना स्वत: निवडणूक लढणार का? याकडे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदासाठी अर्ज घेतले. अर्ज वितरणानंतर आता शुक्रवारी (दि.२७) अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या दिवशी किती जण अर्ज दाखल करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

कोणत्या पक्षाचा होणार उपमहापौर?राज्यात बदलेल्या परिस्थितीमुळे उपमहापौरपदासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसते. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे उपमहापौरपद शिवसेनेकडे राहील, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही दिसते. या सगळ्यात नेमके कोणत्या पक्षाचा उपमहापौर होणार, हे ३१ डिसेंबर रोजीच स्पष्ट होईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस