शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

कथा नव्हे, व्यथा मांडून व्यवस्थेशी भांडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:24 IST

प्रा. अनिलकुमार साळवे यांची विशेष मुलाखत

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : आज समाजाने उंबरठ्याबाहेर अनेक गोष्टी फेकून दिल्या आहेत. माझ्या लघुपटातून किंवा लेखनातून वर्तुळाबाहेरच्या या कथा नव्हे, तर व्यथा मांडून व्यवस्थेशी भांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मी लहानपणी जे पाहिले ते फक्त ‘१५ आॅगस्ट’ या लघुपटातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, अशा भावना प्रा. अनिलकुमार साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. 

प्रा. साळवेलिखित तथा दिग्दर्शित ‘१५ आॅगस्ट’ या लघुपटाला लंडन येथे झालेल्या न्यूलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. यानिमित्त ही विशेष मुलाखत. 

प्रश्न- चित्रपट जगताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या क्षेत्राकडे कसे वळलात?- बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात मी जन्माला आलो. बालवयात, तरुणपणात अनेक भोग वाट्याला आले. अनेक व्यथा, दु:ख मी जवळून पाहिले. दु:ख अनावर झाल्यावर माणूस रडतो तसे मी फक्त माझा हा आक्रोश कागदावर लेखन स्वरूपात उतरवत गेलो आणि एके क कथा तयार होत गेली. नकला करायचा छंद लहानपणापासूनच होता. त्यानंतर एका भावाच्या मदतीने एकांकिकेत काम करायला लागलो आणि या दिशेने पाऊल पडले.

प्रश्न- ‘१५ आॅगस्ट’ लघुपटाची कथा नेमकी सुचली कशी?- माझ्या गावात सोजर नावाची वेश्या राहायची. लहानपणी रोजच ती दिसायची. आमच्याशी ती बोलायची, हसायची. त्या वयात काही कळायचे नाही; पण मोठे होत गेलो, तसे तिचे हाल कळायला लागले. तिचा मृत्यूही मोठ्या दुर्दैवी पद्धतीने झाला. हे सगळे मनात साठलेले होतेच त्यामुळे माझ्या गावातील हे खरे कथानक घेतले. त्याला माझ्या दु:खांचीही जोड दिली आणि ‘१५ आॅगस्ट’ची कथा तयार झाली.

प्रश्न- या चित्रपटाच्या दिग्दर्शनाविषयी सांगा.- दिग्दर्शनाचे कोणतेही तांत्रिक शिक्षण मी घेतलेले नाही. त्यामुळे मला जे आणि जसे दिसते तसेच प्रेक्षकांपुढे ठेवायचे, असा प्रयत्न केला. डोळ्यांएवढा सुंदर कॅमेरा दुसरा कोणताही नाही, असे मी मानतो. कोणते दु:ख कोणत्या अँगलने पाहायचे, हे मला वास्तव जीवनात सोसलेल्या कष्टांमुळे फार चांगले उमजते. त्यामुळे दिग्दर्शन म्हणून विशेष काहीही न करता फक्त जे पाहिले आहे, त्याला न्याय देण्याचा करीत गेलो. 

प्रश्न- या चित्रपटातील कलावंतांची निवड कशी केली?- चित्रपटातील भूमिकेला शोभतील, अशा व्यक्तींना चेहरा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील सर्व कलाकार हे कामगार कुटुंबातील आहेत.

‘गरिबी मजबुरी नाही, मजबुती’मी भोगलेली गरिबी आज माझी मजबुरी नाही तर मजबुती झाली आहे. प्रबोधनाच्या चळवळी विषाच्या बाटलीत बंद झाल्या आहेत. पुस्तकातही आज जे विषय वाचायला मिळत नाहीत, असे वर्तुळाबाहेर फेकलेले विषय यापुढे मांडत राहण्याचा मानस आहे. माझ्या कामातून कोणताही उपदेश न करता जसे दिसते तसे मांडायचा प्रयत्न आहे.

टॅग्स :artकलाDevgiri College Aurangabadदेवगिरी महाविद्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबाद