अजूनही ५०0 विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध उभेच
By Admin | Updated: May 23, 2014 01:07 IST2014-05-23T00:49:11+5:302014-05-23T01:07:55+5:30
औरंगाबाद : रस्त्याच्या कडेला असलेले ५३७ विद्युत खांब रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध आलेत. हेच खांब आता लहान-मोठ्या अपघातांचे कारण ठरत आहेत.

अजूनही ५०0 विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध उभेच
औरंगाबाद : रस्त्याच्या कडेला असलेले ५३७ विद्युत खांब रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध आलेत. हेच खांब आता लहान-मोठ्या अपघातांचे कारण ठरत आहेत. जीटीएलने शहरातील ६ प्रमुख रस्त्यांवरील ३७ खांब हटवून हात वर केले. रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळे ठरणारे ५०० विद्युत खांब कधी हटणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अनेक अडचणींना तोंड देत महानगरपालिकेने १४ रस्त्यांचे रुंदीकरण केले. त्यापैकी काही रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू झाले आहे. खांब हटविण्यासाठी मनपाने जीटीएलला २ कोटी रुपये दिले होते. जीटीएलने ६ रस्त्यांवरील ३७ खांब हटविले, असा दावा केला आहे. आता खांब कोण हटविणार? यावर मनपा व जीटीएल यांच्यात वाद सुरू आहे. क्रांतीचौक ते उस्मानपुरादरम्यान खांब हटविण्याचे काम लांबणीवर पडले आहे. रोज कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर किरकोळ अपघातांना ते कारण ठरत आहेत. खांबावर वाहने आदळत आहेत. जीटीएलचा दावा खांब हटविण्यासाठी महानगरपालिकेने जीटीएलला २ कोटी रुपये दिले होते. त्यात महात्मा चौक (बळवंत वाचनालय) ते औरंगपुरा येथील पोलीस चौकीपर्यंत, औरंगपुरा ते गुलमंडी, महात्मा गांधी पुतळा ते सिटीचौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज, शहागंज ते मंजूरपुरा व पदमपुरा ते सिल्लेखाना या रस्त्यावरील खांब हटविल्याची माहिती जीटीएलचे पीआरओ समीर पाठक यांनी दिली. बेगमपुरा ते बीबी का मकबरा रस्ता, मकाईगेट ते विद्यापीठगेटपर्यंतचा रस्ता तसेच जुन्या शहरात औरंगपुरा ते अंगुरीबाग रस्ता, दिवाणी देवडी रस्ता या रस्त्यावर ४८ खांब अडथळे ठरत आहेत.शहागंज ते जुना बाजारपर्यंतच्या (जुने पोस्ट आॅफिस) रस्त्याचे रुंदीकरण होऊन दोन वर्षे पूर्ण झाली; पण आजही या भागात रस्त्याच्या मधोमध उभे असलेले खांब रहदारीस अडथळा ठरत आहेत. यासंदर्भात सराफा व्यापारी जुगलकिशोर वर्मा यांनी सांगितले की, मार्च २०१२ मध्ये शहागंजमधील गांधी पुतळा ते जुना बाजारपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले. गेल्या दोन वर्षांत या रस्त्यावरील खांब हटविण्याची मोहीम अर्धवटच सोडण्यात आली. आजही या रस्त्यावर काही खांब वाहतुकीस अडथळे ठरत आहेत.क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशनदरम्यान सुमारे १५० खांब व १३ डीपी आहेत. येथे खांब हटविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले की, या रस्त्यावर वीज वाहिन्यांचे भूमिगत नेटवर्क करण्यावर भर देण्यात येत आहे.