एस़टी़ला प्रभारींचाच ‘दे धक्का’
By Admin | Updated: December 22, 2014 01:03 IST2014-12-22T00:39:16+5:302014-12-22T01:03:25+5:30
व्यंकटेश वैष्णव ,बीड ‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून प्रवाशांची अविरत सेवा करणारी बसगाडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहन लागले आहे

एस़टी़ला प्रभारींचाच ‘दे धक्का’
व्यंकटेश वैष्णव ,बीड ‘
बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून प्रवाशांची अविरत सेवा करणारी बसगाडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहन लागले आहे. यामध्ये चार एसटी आगारांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने जिल्ह्यातील परिवहन महामंडळाचे नियोजन पुरते कोलमडले असल्याचे चित्र पहावयास मिळते. जिल्ह्यात बहुतांश शासकीय कार्यालयांचा कारभार प्रभारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चालतो. रिक्त पदांची घरघर कायमची असल्याने नागरिकांच्या फायद्याचे अथवा इतर निर्णय घेण्यासाठी संबंधीत कार्यालयांना विलंब लागतो. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य परिवहन महा मंडळा अंतर्गत बीडसाठी एकूण २१ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत, परंतु केवळ १० अधिकाऱ्यांवरच जिल्ह्यातील आठ आगारांचा कारभार चालतो. याशिवाय जिल्ह्यातील एकूण आठ आगारांपैकी चार आगारांचे प्रमुख प्रभारी आहेत. यामध्ये आष्टी, अंबाजोगाई, पाटोदा, गेवराई येथे पूर्णवेळ आगार प्रमुख आहेत. मात्र बीड, परळी, धारूर, माजलगाव या आगारांना मागील अनेक महिन्यापासून पूर्णवेळ आगार प्रमुख नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आठ आगारांच्या मिळून पाचशेच्या जवळपास बसगाड्या आहेत. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या यामुळे उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत आहे. यातच पूर्णवेळ काम करणारे अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रभारी अधिकारी कामकाजासाठी पुरेसा वेळ देत नसल्याचे पहावयास मिळत आहे.४ बीड आगाराच्या अंतर्गत १०० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ ४५ कर्मचारी कार्यरत आहेत. विविध ठिकाणी पदे रिक्त असल्याने एका कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन ठिकाणचा पदभार स्वीकारावा लागत आहे. असे कर्मचाऱ्यांनी खाजगीत सांगितले.