शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
3
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
4
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
5
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
8
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
9
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
10
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
11
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
12
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
13
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
14
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
15
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
16
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
17
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
18
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
19
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
20
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 18:34 IST

सुरुवातीला मिळाली तीन शाखांना मंजुरी..येथून बाहेर पडलेल्या अभियंत्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यशैलीचा अमीट ठसा उमटविला. हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने जागविलेल्या या आठवणी...

ठळक मुद्दे ८३ विद्यार्थ्यांवर सुरू झाले महाविद्यालय आता घेतात २००० विद्यार्थी शिक्षण

- राम शिनगारे  

औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (जिका) १९६० साली अवघ्या तीन शाखा आणि ८३ विद्यार्थ्यांवर सुरू झाले होते. आता महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला असून, तब्बल १६ हजारांपेक्षा अधिक उत्कृष्ट अभियंते घडविण्याचे काम केले आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेऊन अभियांत्रिकी शिक्षणाचा प्रसार करण्याचे कामही याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. तीन विभागांवर सुरूझालेल्या या महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.चे २ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत.

हैदराबाद राज्यात असलेला मराठवाडा १९५७ साली विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. तेव्हा मराठवाड्यात शिक्षणाचे बीजारोपण व्हावे, यासाठी आग्रही मागणी पुढे आली. तेव्हा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी जोर धरूलागली. मात्र, विद्यापीठ स्थापन करण्याएवढी महाविद्यालये मराठवाड्यात नव्हती. तरीही मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी औरंगाबादेत मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानुसार २३ आॅगस्ट १९५८ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन झाले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी

तेव्हा मराठवाड्यात अवघी ९  महाविद्यालये होती. यात कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक शाखांचे शिक्षण देणारी ५ महाविद्यालये आणि कृषी, वैद्यकीय, विधि व अध्यापक या अभ्यासक्रमांची चार महाविद्यालये कार्यरत होती. अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे एकही महाविद्यालयात मराठवाड्यात नव्हते. तेव्हा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी औरंगाबादेत १९६० साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली. यानुसार औरंगाबादेत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. तेव्हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. पहिल्या वर्षी सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल तीन विभागांना मान्यता मिळाली. यात अनुक्रमे ६०, ३०,३० असे एकूण १२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र सिव्हिल अभ्यासक्रमाच्या ६० जागांपैकी केवळ २३ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या २३ विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा

१९८६ साली तत्कालीन प्राचार्यांनी पार्टटाईम कोर्स वर्क सुरूकेला. तसेच याचवर्षी इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स या दोन नव्या विभागांना मान्यता मिळाली. त्या अभ्यासक्रमांना प्रत्येक ६० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत होते. पुढे २००० साली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा नवीन विभाग मंजूर झाला. यालाही ६० विद्यार्थी एवढी संख्या होती. महाविद्यालयात सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, क ॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सहा पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. २००४ साली महाविद्यालयात ७ विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली. विद्यमान स्थितीत ६ पदवी, ७ पदव्युत्तर, एमसीए, पीएच.डी. या अभ्यासक्रमांना २ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पीएच.डी. संशोधनाचे संशोधन केंद्र म्हणूनही महाविद्यालयाला मान्यता मिळालेली असून,यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी संशोधन करीत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. पी.बी. मुरनाळ यांनी दिली.

टॅग्स :Goverment Engineering College Aurangabadशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण