शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:53 IST

जागोजागी साचलेला कचरा, तुटलेले दुभाजक, फुटपाथचा अभाव, रस्त्याच्या कडेला उभ्या भंगार वाहनांचा उल्लेख

ठळक मुद्देशहरातील विविध विकासकामांचा आढावा ठाकरे यांनी घेतला.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर जिकडेतिकडे कचरा दिसून येतोय. रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाच्या लोखंडी जाळ्या तुटलेल्या आहेत. रस्त्याच्या कडेला भंगार गाड्या उभ्या आहेत. फुटपाथचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतोय. शहर स्वच्छ दिसावे यासाठी कचऱ्याची चळवळ उभी करा, असा सल्ला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांना दिला.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खा. चंद्रकांत खैरे, सभागृनेता विकास जैन, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शहरातील विविध विकासकामांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. प्रारंभी, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट बस, सफारी पार्कच्या कामांचे सादरीकरण केले. शहरातील ११३ रस्त्यांचा ४६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यात रोड फर्निचरचाही समावेश असल्याचे सांगितले. सातारा- देवळाई व शहरासाठी वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्यात आले असले तरी शासनातर्फे शक्य तेवढा निधी दिला जाईल. मात्र, रस्त्यांची कामे अर्धवट न सोडता पूर्ण करा, असा टोला ठाकरे यांनी मारला. फुटपाथवर इमॉस काँक्रिटीकरणचा वापर करा, तुटलेल्या, उखडलेल्या, मोडकळीस आलेल्या दुभाजकांची दुरुस्ती करा, फुटपाथवर झाडे लावण्यासाठी कुंड्यांचा वापर करा, असा सल्ला त्यांनी दिला. वेरूळ ते घृष्णेश्वर मंदिरापर्यंतच्या बायपास रस्त्यासाठी पर्यटन विभागाकडून २२ कोटींचा निधी मिळावा, शहरातील महेमूद दरवाजा, मकाईगेट, बारापुल्लागेटच्या बाजूने रस्ता, पूल करण्यासाठी ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केल्याचेही बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले. दौलताबाद येथील घाटात गेटच्या बाजूने रस्ता करण्यासाठी केंद्राकडे ७८ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. आजपर्यंत मंजूर झाला नाही. पंतप्रधान आवास योजनेसाठी येत्या आठ दिवसांत तीसगाव येथील जागा महापालिकेला देण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. संत एकनाथ रंगमंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्यात येणार, सलीम अली सरोवर परिसरात स्वच्छता ठेवा, अशा सूचना त्यांनी महापालिकेला केल्या. 

शिवरायांचा पुतळा दिसणार का? क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी मनपातर्फे करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, उंची वाढविल्यानंतर महाराजांचा पुतळा खाली उभ्या व्यक्तीला दिसणार का? उड्डाणपुलावरून तरी पुतळा दिसेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी चांगले डिझाईन तयार करा, अशी सूचना त्यांनी केली.

शहरात पाणी येण्यास चार वर्षेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करण्यात आले. योजना पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेबद्दलही माहिती देण्यात आली.

कोणते खासदार...स्मार्ट सिटी बसचे अधिकारी प्रशांत भुसारी बैठकीत माहिती देत होते. त्यांनी खासदारांच्या सूचनेनुसार बस फेऱ्या वाढविल्याचे सांगितले. हजरजवाबी आदित्य ठाकरे यांनी पटकन विचारले कोणते खासदार...येथे तर दोन खासदार बसले आहेत. एक आजी, तर दुसरे माजी आहेत. भुसारी यांनी चलाखीने दोन्हींच्या सूचनेनुसार म्हणून वेळ मारून नेली. त्यावरही आदित्य ठाकरे म्हणाले आता त्यांच्या खुर्चीचा वाद मिटला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAaditya Thackerayआदित्य ठाकरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न