शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

हरिण- मोरांकडून कोवळे पीक फस्त

By admin | Updated: July 27, 2014 01:13 IST

औसा : तालुक्यात पावसाअभावी पेरण्या तब्बल महिनाभर उशिराने झाल्या़ परिणामी सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले़ त्यात ५० टक्के क्षेत्रावर बियाणे उगवले नाही़

औसा : तालुक्यात पावसाअभावी पेरण्या तब्बल महिनाभर उशिराने झाल्या़ परिणामी सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले़ त्यात ५० टक्के क्षेत्रावर बियाणे उगवले नाही़ जे बियाणे उगवले ते आता हरिण आणि मोर फस्त करीत आहेत़ वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले आहेत़
औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे़ तालुक्यात सिंचन क्षेत्र ही अगदी कमी आहे़ गेल्या चार- पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बागायती क्षेत्र मोडकळीस आले आहे़यंदाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला़ त्यातच खरीप हंगामात काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची उगवण झाली नाही़ ज्या शेतकऱ्यांचे पीक उगवले आहे़ त्यावर हरिण, मोर ताव मारीत आहेत़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे़ पेरण्या झाल्यानंतर मोठा पाऊसच न झाल्यामुळे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात उगवण झालेल्या कोवळ्या पिकांची नासधूस करीत आहेत़
गेल्या काही वर्षांत तालुक्यात हरणांची संख्या वाढली आहे़ तालुक्यात जवळपास आठ ते दहा हजार हरणांची संख्या आहे़ हरिण हा माळरानावर राहणारा प्राणी आहे़ पण आता मात्र कुठेही हरणांचे कळप दिसू लागले आहेत़ एका कळपात २० ते २५ हरिण असतात़ एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात हरिण घुसले की त्याचे उगवलेले सोयाबीन फस्त करीत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना उगवलेल्या सोयाबीनची राखण करावी लागत आहे़ तालुक्यातील नागरसोगा, दापेगाव, तुंगी, चिंचोली, भादा, हासेगाव, गोद्री, लामजना, उत्का, दावतपूर या गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत़(वार्ताहर)
दिवसरात्र पिकांची राखण़़़
हरणांनी एकदा सोयाबीनचा उगवण झालेला शेंडा खाल्ला की पुन्हा फुटत नाही़ त्यामुळे रात्रं-दिवस राखण करावी लागत असल्याचे नागनाथ शिंदे, जगदीश मिश्रा, संजय सूर्यवंशी, हणमंत काकडे, दत्तू पांचाळ या शेतकऱ्यांनी सांगून दिवस-रात्र राखण करावी लागत असल्याचे म्हणाले़