शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

SSC Result 2020 : औरंगाबाद विभाग राज्यात सर्वात शेवटी तरीही १७ टक्क्यांनी वाढला निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 7:04 PM

औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ठळक मुद्देविभागात जालना जिल्हा टॉपवर, परभणी तळाला

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागाने ९८.७७ टक्के निकालाची नोंदवत आघाडी कायम राखली. औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला असून, राज्यात शेवटचा क्रमांक मिळाला. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल १६.८० टक्के अधिक लागला. बुधवारी औरंगाबाद विभागाचा निकाल विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी जाहीर केला. यावेळी सहसचिव विजय जोशी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण उपस्थित होते. 

औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख ६९ हजार ९९१  जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२ आहे. १५ हजार ९४६ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १५ हजार ७६०  जणांनी परीक्षा दिली. त्यात १०, ९२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.३४ आहे. 

६२४ केंद्रावर परीक्षाविभागात दहावीची परीक्षा ६२४ केंद्रावर झाली. यासाठी ६३ परीक्षक, ६२४ केंद्र संचालक आणि सहकेंद्रसंचालक, ११ हजार २३१ पर्यवक्षकांनी कार्य केले होते. परीक्षेच्या कालावधीत पाच जिल्ह्यांत एकूण १८१ गैरप्रकार घडले होते. त्यापैकी ७० गैरप्रकारांच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून, त्यातील ६९ जणांच्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली. दहावीच्या निकालात कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे आॅनलाईन पद्धतीने करता येईल, असेही सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र