शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीचे काम वेगाने करा, अन्यथा दंड ! महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंपनीला बजावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 19:52 IST

Aurangabad Municipal Corporation महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे नवीन पाणीपुरवठा ( New Water Pipeline in Aurangabad ) योजनेची काही कामे बंद ठेवण्यात आली होती. आता पावसाळा संपला असून, कामांना गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला दिला आहे. नोव्हेंबरमध्ये मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मजिप्रामार्फत योजनेचे काम सुरू आहे. हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला काम देण्यात आले आहे. कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच शहरात कामाला सुरुवात केली. शहरात १५ जलकुंभ उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, आणखी ५ जलकुंभांचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नक्षत्रवाडी येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि दोन एमबीआर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सातारा-देवळाई भागात जलवाहिन्या टाकण्याचे कामही सुरू आहे, परंतु अतिवृष्टीमुळे महिनाभर सर्व कामे थांबविण्यात आली होती. आता पावसाळा संपला असून कामाला गती देण्याच्या दृष्टीने कंत्राटदारास सूचना करण्यात आल्या आहेत. कामात गती न दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी सांगितले.

औरंगाबादेत तयार होणार पाईपजायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी कंत्राटदाराने नक्षत्रवाडीजवळ पाईप तयार करण्याची फॅक्टरी उभारण्याचे काम सुरू केले आहे. पत्र्याचे शेड उभारले जात असून, दोन मशीन आणण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरअखेरीस पाईप तयार होतील. पाईपची लांबी आणि रुंदी बरीच असल्याने वाहतुकीला प्रचंड त्रास झाला असता. म्हणून पाईप औरंगाबादेत तयार केले जाणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत मुख्य जलवाहिनीचे पाईप तयार होतील अशी अपेक्षा आहे.

जायकवाडीतही कामेयोजनेत प्रामुख्याने जायकवाडी धरणावर उद्भव विहीर व पंपगृह, ३९२ एमएलडी एवढ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, शहर व सातारा देवळाई क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी ४९ उंच तर ४ जमिनीलगत अशा पाण्याच्या ५३ टाक्या, जवळपास ४० किलोमीटर लांबीची अशुद्ध पाण्याची जलवाहिनी, ८४ किलोमीटर पाणी वाहून नेणारी जलवाहिनी व १,९११ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था, सुमारे ९० हजार घरगुती नळजोडण्या विस्थापित करणे, स्टाफ क्वॉर्टर, पंपिंग मशिनरी, एक्स्प्रेस फिडर या कामांचा समावेश आहे. नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेची वैशिष्ट्ये :१२ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली. जलवाहिन्या टाकणे, नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे इ. कामे सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.- २४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी २१,०० कि.मी. अंतर्गत जलवाहिन्या- ६०४ एमएलडी पाणी शहराला मिळेल- २०५२ पर्यंत योजनेचा शहराला लाभ- २ टप्प्यांत योजना पूर्ण होईल- १५ वर्षांचा पहिला टप्पा- १५ वर्षांचा दुसरा टप्पा- ५५३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीचा खर्च- २७३ कोटी अंतर्गंत जलवाहिन्यांचा खर्च- पाण्याच्या ५३ टाक्या उभारणार- ६६० मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत एमबीआर- ८ कोटी रुपये दरमहा विजेचा खर्च होईल

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी