शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जलवाहिनीचे काम वेगाने करा, अन्यथा दंड ! महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंपनीला बजावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 19:52 IST

Aurangabad Municipal Corporation महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे नवीन पाणीपुरवठा ( New Water Pipeline in Aurangabad ) योजनेची काही कामे बंद ठेवण्यात आली होती. आता पावसाळा संपला असून, कामांना गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला दिला आहे. नोव्हेंबरमध्ये मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मजिप्रामार्फत योजनेचे काम सुरू आहे. हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला काम देण्यात आले आहे. कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच शहरात कामाला सुरुवात केली. शहरात १५ जलकुंभ उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, आणखी ५ जलकुंभांचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नक्षत्रवाडी येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि दोन एमबीआर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सातारा-देवळाई भागात जलवाहिन्या टाकण्याचे कामही सुरू आहे, परंतु अतिवृष्टीमुळे महिनाभर सर्व कामे थांबविण्यात आली होती. आता पावसाळा संपला असून कामाला गती देण्याच्या दृष्टीने कंत्राटदारास सूचना करण्यात आल्या आहेत. कामात गती न दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी सांगितले.

औरंगाबादेत तयार होणार पाईपजायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी कंत्राटदाराने नक्षत्रवाडीजवळ पाईप तयार करण्याची फॅक्टरी उभारण्याचे काम सुरू केले आहे. पत्र्याचे शेड उभारले जात असून, दोन मशीन आणण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरअखेरीस पाईप तयार होतील. पाईपची लांबी आणि रुंदी बरीच असल्याने वाहतुकीला प्रचंड त्रास झाला असता. म्हणून पाईप औरंगाबादेत तयार केले जाणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत मुख्य जलवाहिनीचे पाईप तयार होतील अशी अपेक्षा आहे.

जायकवाडीतही कामेयोजनेत प्रामुख्याने जायकवाडी धरणावर उद्भव विहीर व पंपगृह, ३९२ एमएलडी एवढ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, शहर व सातारा देवळाई क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी ४९ उंच तर ४ जमिनीलगत अशा पाण्याच्या ५३ टाक्या, जवळपास ४० किलोमीटर लांबीची अशुद्ध पाण्याची जलवाहिनी, ८४ किलोमीटर पाणी वाहून नेणारी जलवाहिनी व १,९११ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था, सुमारे ९० हजार घरगुती नळजोडण्या विस्थापित करणे, स्टाफ क्वॉर्टर, पंपिंग मशिनरी, एक्स्प्रेस फिडर या कामांचा समावेश आहे. नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेची वैशिष्ट्ये :१२ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली. जलवाहिन्या टाकणे, नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे इ. कामे सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.- २४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी २१,०० कि.मी. अंतर्गत जलवाहिन्या- ६०४ एमएलडी पाणी शहराला मिळेल- २०५२ पर्यंत योजनेचा शहराला लाभ- २ टप्प्यांत योजना पूर्ण होईल- १५ वर्षांचा पहिला टप्पा- १५ वर्षांचा दुसरा टप्पा- ५५३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीचा खर्च- २७३ कोटी अंतर्गंत जलवाहिन्यांचा खर्च- पाण्याच्या ५३ टाक्या उभारणार- ६६० मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत एमबीआर- ८ कोटी रुपये दरमहा विजेचा खर्च होईल

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी