शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रूण हत्या रोखण्यासाठी विशेष योजना

By admin | Updated: November 4, 2014 01:38 IST

बीड : शिक्षण व आरोग्य विभागात धोरणात्मक योजना राबवायच्या आहेत़ जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लवकरच विशेष योजना राबविणार असून त्याचा कृती आराखडा आठ दिवसात तयार होईल,

बीड : शिक्षण व आरोग्य विभागात धोरणात्मक योजना राबवायच्या आहेत़ जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लवकरच विशेष योजना राबविणार असून त्याचा कृती आराखडा आठ दिवसात तयार होईल, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांची उपस्थिती होती़ सोनवणे म्हणाले, शिक्षण विभागात अनियमितता झाली आहे काय याची खातरजमा करण्यात येईल़ बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आली असून आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत़ कारण आऱ टी़ ई़ नुसार शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त झाल्या आहेत़ शिक्षण विभागात अनियमिततेला थारा देणार नाही़ अधिकारी व शिक्षकांवर अंकुश ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले़ केंद्रांची पुनर्रचना करणारशाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही, असे सभापती बजरंग सोनवणे यांनी सांगितले़ सध्या केंद्रांतर्गत २० ते २५ शाळा आहेत़ त्यामुळे नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही़ त्यासाठी केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे़ एका केंद्रामध्ये ८ ते १० शाळांचा समावेश करण्यात येईल़ एम़ ओ़ २४ तास उपलब्धप्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुजू होऊन उच्च शिक्षणासाठी पगारी रजेवर जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोनवणे म्हणाले़ साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या असून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तालुकानिहाय जबाबदारी निश्चित केली आहे़ वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील़ आरोग्य केंद्रांतील शस्त्रक्रिया विभाग, शवविच्छेदन विभाग अद्यावत करण्यात येईल, रुग्णांना अडचण आल्यास माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले़ (प्रतिनिधी)जि़ प़ उपाध्यक्षा आशा दौंड यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली़४पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरूस्तीसाठी आलेले १ कोटी १७ लाख रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडकलेले आहेत़ ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्षा दौंड म्हणाल्या़४कृषी व पशुसंवर्धन हा महत्वाचा विभाग आहे़ मात्र केवळ ७ लाख रूपये निधीची तरतूद केली आहे़ अहमदनगर जि़ प़ च्या धर्तीवर निधी १ कोटी रूपयांपर्यंत वाढवून घेण्यात येईल़४शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे त्या म्हणाल्या़