शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

दुष्काळग्रस्तांच्या व्यथा : एकेकाळी नदीच्या पाण्यावर घेतला ऊस, आता टँकरवर भागवावी लागतेय तहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:11 IST

माझ्या डोळ्यासमोरचा काळ आहे. गिरिजा नदीच्या पात्रात पिंप टाकून १२ एकरांत ऊस काढायचो, इतकं पाणी होतं. त्याच ठिकाणी १२ पुरूस खोदलेली विहीर आता कोरडीठाक पडलीय.

- भागवत हिरेकरऔरंगाबाद : माझ्या डोळ्यासमोरचा काळ आहे. गिरिजा नदीच्या पात्रात पिंप टाकून १२ एकरांत ऊस काढायचो, इतकं पाणी होतं. त्याच ठिकाणी १२ पुरूस खोदलेली विहीर आता कोरडीठाक पडलीय. आता टँकर घेऊन तहान भागवावी लागतेय. छगन वनारसे नदीच्या पात्राकडे बोट दाखवून सांगत होते. नदी काठावरील हसनाबाद, घोषेगावमधील शेतकरी दुष्काळामुळे होरपळले आहेत.भोकरदन तालुक्यातून जाणाऱ्या गिरिजा आणि पूर्णा नद्या अवैध वाळू उपशामुळेच वाहणं बंद झाल्या आहेत. या जोपर्यंत खळाळत्या होत्या, तोपर्यंत त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये कृषी संस्कृतीची बीज रोवली. त्याच नद्यांची पाण्यासाठी चाळणी झालीय. काठावरची शेती ओसाड पडली आहे.वनारसे यांची सात एकर जमीन आहे. रिकामं बसवत नाही. काहीतरी करावं लागन ना? राजूरला रस्त्याची कामे करणाºया कंपनीत कामाला जातोय. चारशे रुपये हाजरी आणि एकवेळच जेवण. काय सांगायचं. पाण्यानं खेळ बिघडलाय सगळा. एव्हढं अवघड झालय की, घरादारासह जनावरांनाही टॅँकरने पाणी पाजावं लागतंय. बाराशे ते दीड हजार रुपये टँकरमागे जातात. एका जनावराला दिवसाला पन्नास लिटर पाणी लागतं. कडबा न्याराच, वनारसे म्हणाले.गिरिजा नदीच्या खोºयातील हसनाबाद, घोषेगाव, इटा, खडगाव आणि पसिरातील पूर्णेच्या खोºयातील शेतकरी दुष्काळाच्या फेºयाने आता हैराण झाला आहे. काठावरची शेती ओसाड पडली आहे. हसनाबादमार्गे जाणाºया रस्त्याने फुलंब्रीपासून भोकरदनपर्यंत सगळ्यांचा एकच प्रश्न. पाणीच नाही, काय करायचं?२५ टक्के मराठवाडा टँकरच्या पाण्यावरऔरंगाबाद : मराठवाड्यातीलसुमारे २५ टक्के ग्रामीण लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. २०११च्या जनगणनेनुसार विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यंदाच्या भीषण दुष्काळामुळे त्यातील सुमारे ४५ लाख लोक पाण्याविना व्याकूळ आहे. यंदाच्या वर्षातील दुष्काळ हा या दशकातील सर्वांत भीषण ठरत आहे.२०१२नंतर प्रथमच पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. २ हजार ७०० टँकरने सुमारे २ हजार गावांत आणि ७२५ वाड्यांवर पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. दर आठवड्याला ४२ गावांत टँकरची मागणी पूर्ण करावी लागते. ५१ टँकर त्यासाठी नव्याने सुरू करावे लागत आहेत. मे अखेरपर्यंत हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दुष्काळ परिस्थिती अत्यंत भीषण आहे. उर्वरित जिल्ह्यांतही दुष्काळाच्या झळा बसत आहेत; परंतु त्या जिल्ह्यात थोड्या-फार प्रमाणात पाणी असल्यामुळे टँकरचा आकडा कमी आहे. ४४५९ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.चारा, पाण्याअभावीचार गायी दगावल्याजळगाव : भोरस बुद्रुक येथील शेतकरी भैय्यासाहेब परभत पाटील यांच्या मालकीच्या दोन गायी व दोन वासरे चारा, पाण्याअभावी मरण पावल्या. त्यामुळे शेतकºयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या आठवड्यात देवळी येथील पोपट नगा काठेवाडी यांच्या ४ गायी पाण्याअभावी दगावल्या.दुष्काळासाठी केंद्र सरकारकडून राज्याला आणखी २१६० कोटीमुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी २१६० कोटी रुपयांची मदत मिळाली असून त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला सातत्याने मदत होते आहे. आतापर्यंत ४२४८.५९ कोटी रुपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता ४००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.विहिरीने तळ गाठल्यानेशेतकºयाची आत्महत्याकुरुल (जि. सोलापूर) : विहिरीने तळ गाठल्याने पाण्याअभावी ऊस जळून गेला तर डाळिंब बाग पाण्याअभावी जळून चालली होती. त्यामुळेबँकेचे १२ लाख रुपये कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकºयाने आत्महत्या केली.मोहोळ तालुक्यातील येणकी येथील तुकाराम निवृत्ती माने (५६) यांची बारा एकर शेती होती. पत्नी व दोन विवाहित मुलांसह ते शेतातील वस्तीवरच राहत होते.दोन- तीन वर्षात पाऊस कमी झाल्याने विहिरीला जेमतेम पाणी असायचे. मात्र यंदा दुष्काळाने विहीर कोरडी पडल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. अक्षयतृतीया असल्याने कुटुंबातील सदस्य कामात व्यस्त होते. त्याच गडबडीत माने यांनी जीवन संपविले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई