शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

छत्रपती संभाजीनगरची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याचे जायकवाडीत रोज बाष्पीभवन

By बापू सोळुंके | Published: May 02, 2024 7:31 PM

तापमान वाढल्याचा फटका : जायकवाडी प्रकल्पाच्या ३५ हजार हेक्टरवर पाण्याची वाफ

छत्रपती संभाजीनगर : १८ लाख लोकसंख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याची रोज जायकवाडी प्रकल्पात वाफ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असल्याने बाष्पीभवन वाढल्याची माहिती लाभक्षेत्र कडा विकास प्राधिकरणाने (कडा) दिली.

मराठवाड्याची राजधानीचे शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरसह जालना, पैठण शहर आणि एमआयडीसीला जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यासोबत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी प्रकल्पामुळे ओलितखाली येते. यामुळेच जायकवाडी प्रकल्पाला मराठवाड्याचा भाग्यविधाता म्हणून ओळखल्या जाते. महिनाभरापासून मराठवाड्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे.

छत्रपती संभाजीनगरचे तापमानाने ४२अंश सेल्सिअस पर्यंत वाढले होते. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यावर होऊ लागला आहे. वाढत्या तापमानामुळे जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यातील रोज सुमारे ५२० एमएलडी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. हे पाणी छत्रपती संभाजीनगर शहराला सलग चार दिवस पुरेल एवढे असल्याचे कडाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ३५ हजार हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पापैकी आज केवळ २० हजार हेक्टरवर पाणीसाठा पसरलेला आहे. प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उरला आहे. यातच वाढत्या तापमानामुळे रोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन हाेत आहे. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना करणेही खर्चिक असल्याने त्याचा वापर केला जात नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाJayakwadi Damजायकवाडी धरण