शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:21 IST

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. या सगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यक्रमात पंकजा यांनी उपस्थिती दर्शवली आणि भाषणही केलं. त्यामुळे, पंकजा मुंडें पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आता, औरंगाबादमधील कार्यक्रमाला आपण का गेलो हेही पंकजा यांनी स्पष्ट केलं. तसेच, बीडमधील कार्यक्रमाला का नव्हते आणि याबाबत देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलं.  

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा येणार, ते माझे अध्यक्ष आणि मी सविच आहे. त्यामुळे, जेवढा तो कार्यक्रम त्यांचा तेवढाच माझा आणि तेवढाच तो कार्यक्रम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे, मला वाटतं बोलावलं की नाही या चर्चा निरर्थक आहेत. मला नड्डा यांच्या ऑफिसमधूनच हा दौरा असल्याची दोन दिवसांपासून माहिती प्राप्त झाली. त्यामुळे, मी या कार्यक्रमाला येणार नाही हा प्रश्न कोणी निर्माण केला हे मला माहिती नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हटलं. 

मला कोणी निमंत्रण देण्याची आवश्यकताच नाही, कारण हा कोणाचा लग्नसोहळा किंवा वैयक्तिक कार्यक्रम नाही, हा भाजपचा कार्यक्रम आहे. सगळ्या बॅनरवर मी आहे, सगळ्या जाहिरातीत मी आहे, स्टेजवर माझ्यासाठी स्वतंत्र खुर्ची होती, असे म्हणत पंकजा यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली. तर, बीडमधील कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो कार्यक्रम एका विशिष्ट संघटनेचा होता म्हणून मी बीडमधील कार्यक्रमाला नव्हते. मात्र, देवेंद्रजींशी माझं फोनवरुन बोलणं झाल होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की, मी बीडला येत आहे. मात्र, मी बाहेरगावी असल्याने मला त्यांनीही केवळ एका तासासाठी ये-जा न करण्याचं सूचवलं, असेही पंकजा यांनी सांगितले. 

भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युतीचे रणशिंग

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जाहीर सभेत भाजपाने सोमवारी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग फुंकले. शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता सभेमध्ये टीका करण्यात आली. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादBJPभाजपा