शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:21 IST

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. या सगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यक्रमात पंकजा यांनी उपस्थिती दर्शवली आणि भाषणही केलं. त्यामुळे, पंकजा मुंडें पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आता, औरंगाबादमधील कार्यक्रमाला आपण का गेलो हेही पंकजा यांनी स्पष्ट केलं. तसेच, बीडमधील कार्यक्रमाला का नव्हते आणि याबाबत देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलं.  

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा येणार, ते माझे अध्यक्ष आणि मी सविच आहे. त्यामुळे, जेवढा तो कार्यक्रम त्यांचा तेवढाच माझा आणि तेवढाच तो कार्यक्रम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे, मला वाटतं बोलावलं की नाही या चर्चा निरर्थक आहेत. मला नड्डा यांच्या ऑफिसमधूनच हा दौरा असल्याची दोन दिवसांपासून माहिती प्राप्त झाली. त्यामुळे, मी या कार्यक्रमाला येणार नाही हा प्रश्न कोणी निर्माण केला हे मला माहिती नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हटलं. 

मला कोणी निमंत्रण देण्याची आवश्यकताच नाही, कारण हा कोणाचा लग्नसोहळा किंवा वैयक्तिक कार्यक्रम नाही, हा भाजपचा कार्यक्रम आहे. सगळ्या बॅनरवर मी आहे, सगळ्या जाहिरातीत मी आहे, स्टेजवर माझ्यासाठी स्वतंत्र खुर्ची होती, असे म्हणत पंकजा यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली. तर, बीडमधील कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो कार्यक्रम एका विशिष्ट संघटनेचा होता म्हणून मी बीडमधील कार्यक्रमाला नव्हते. मात्र, देवेंद्रजींशी माझं फोनवरुन बोलणं झाल होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की, मी बीडला येत आहे. मात्र, मी बाहेरगावी असल्याने मला त्यांनीही केवळ एका तासासाठी ये-जा न करण्याचं सूचवलं, असेही पंकजा यांनी सांगितले. 

भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युतीचे रणशिंग

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जाहीर सभेत भाजपाने सोमवारी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग फुंकले. शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता सभेमध्ये टीका करण्यात आली. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादBJPभाजपा