शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:21 IST

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. या सगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यक्रमात पंकजा यांनी उपस्थिती दर्शवली आणि भाषणही केलं. त्यामुळे, पंकजा मुंडें पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आता, औरंगाबादमधील कार्यक्रमाला आपण का गेलो हेही पंकजा यांनी स्पष्ट केलं. तसेच, बीडमधील कार्यक्रमाला का नव्हते आणि याबाबत देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलं.  

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा येणार, ते माझे अध्यक्ष आणि मी सविच आहे. त्यामुळे, जेवढा तो कार्यक्रम त्यांचा तेवढाच माझा आणि तेवढाच तो कार्यक्रम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे, मला वाटतं बोलावलं की नाही या चर्चा निरर्थक आहेत. मला नड्डा यांच्या ऑफिसमधूनच हा दौरा असल्याची दोन दिवसांपासून माहिती प्राप्त झाली. त्यामुळे, मी या कार्यक्रमाला येणार नाही हा प्रश्न कोणी निर्माण केला हे मला माहिती नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हटलं. 

मला कोणी निमंत्रण देण्याची आवश्यकताच नाही, कारण हा कोणाचा लग्नसोहळा किंवा वैयक्तिक कार्यक्रम नाही, हा भाजपचा कार्यक्रम आहे. सगळ्या बॅनरवर मी आहे, सगळ्या जाहिरातीत मी आहे, स्टेजवर माझ्यासाठी स्वतंत्र खुर्ची होती, असे म्हणत पंकजा यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली. तर, बीडमधील कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो कार्यक्रम एका विशिष्ट संघटनेचा होता म्हणून मी बीडमधील कार्यक्रमाला नव्हते. मात्र, देवेंद्रजींशी माझं फोनवरुन बोलणं झाल होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की, मी बीडला येत आहे. मात्र, मी बाहेरगावी असल्याने मला त्यांनीही केवळ एका तासासाठी ये-जा न करण्याचं सूचवलं, असेही पंकजा यांनी सांगितले. 

भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युतीचे रणशिंग

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जाहीर सभेत भाजपाने सोमवारी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग फुंकले. शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता सभेमध्ये टीका करण्यात आली. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादBJPभाजपा