अडथळ्यांमुळे उड्डाणपूल उभारणीचे काम धीम्या गतीने
By Admin | Updated: December 11, 2014 00:45 IST2014-12-11T00:06:52+5:302014-12-11T00:45:46+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शहरात तीन उड्डाणपूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे;

अडथळ्यांमुळे उड्डाणपूल उभारणीचे काम धीम्या गतीने
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शहरात तीन उड्डाणपूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे; परंतु उड्डाणपुलांच्या मार्गातील अतिक्रमणाचा प्रश्न, जलवाहिनी, ड्रेनेजलाईन आणि विद्युत खांबांचे स्थलांतर करण्याच्या प्रश्नांमुळे उड्डाणपुलांची उभारणीची गती काहीशी धीम्या गतीने होत असल्याचे दिसून येते.
रस्ते विकास महामंडळातर्फे महावीर चौक, मोंढा नाका आणि सिडको बसस्थानक चौक येथील उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या लोकसंख्येत आणि वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जालना रोडवर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे.
क्रांतीचौक आणि सेव्हन हिल उड्डाणपुलानंतर आता या मार्गावर एकाच वेळी तीन उड्डाणपुलांची उभारणी सुरू झाल्याने या रोडवरील वाहतूक कोंडी आगामी कालावधीत सुटणार आहे; परंतु उड्डाणपुलाची उभारणी करीत असताना अद्यापही जलवाहिनी, ड्रेनेजलाईन, विद्युत खांब यांचे अडथळे कायम असल्याचे चित्र दिसून येते. अशा अडथळ्यांमुळे कामाची गती काहीशी मंदावत आहे.