शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

कशीशच्या खून खटल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:01 IST

Kashish murder case: पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तपास गुन्हे शाखेकडे वर्ग; चमूत २ निरीक्षक, २ उपनिरीक्षक

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीशच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. वेदांतनगर पोलिसांकडून हा तपास काढून घेत गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या पथकात दोन वरिष्ठ निरीक्षकांसह दोन उपनिरीक्षकांची नियुक्ती केली. याविषयीचे आदेश पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी काढले आहेत.

रचनाकार कॉलनीत शरणसिंग सेठी याने २०० फूट ओढत नेऊन कशीशचा २१ मे रोजी दुपारी निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला २४ तासांत बेड्या ठोकल्या. मात्र खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पोलिसांचा तपासही तेवढ्याच वेगवान पद्धतीने होऊन सज्जड पुरावे जोडावे लागणार आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डाॅ. गुप्ता यांनी तपासासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. यात सायबर ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर, वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, हवालदार सुनील बडगुजर आणि वीरेश बने यांचा समावेश आहे. मुख्य तपासी अधिकारी म्हणून निरीक्षक आघाव काम करतील.

...अन् तपासी अधिकारी बदललेघटना घडल्याच्या दिवशी गुन्हे शाखेचे निरीक्षक आघाव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मूळ फिर्याद अधिक मजबूत करण्यासाठी टायपिस्टकडे बसून चुका दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र शेजारच्या केबिनमध्ये बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आपल्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी आघाव यांना स्वत:च्या केबिनमध्ये पोलिसांकरवी बोलावून घेतले. आघाव यांनी चुका दुरुस्त करीत असल्याचा निरोप दिल्यानंतरही बोलावणे थांबले नाही. त्यामुळे आघाव यांनी तेथून काढता पाय घेतला. आता आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासी अधिकारी बदलून आघाव यांच्याकडे तपास सोपवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद