शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कशीशच्या खून खटल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:01 IST

Kashish murder case: पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तपास गुन्हे शाखेकडे वर्ग; चमूत २ निरीक्षक, २ उपनिरीक्षक

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीशच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. वेदांतनगर पोलिसांकडून हा तपास काढून घेत गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या पथकात दोन वरिष्ठ निरीक्षकांसह दोन उपनिरीक्षकांची नियुक्ती केली. याविषयीचे आदेश पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी काढले आहेत.

रचनाकार कॉलनीत शरणसिंग सेठी याने २०० फूट ओढत नेऊन कशीशचा २१ मे रोजी दुपारी निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला २४ तासांत बेड्या ठोकल्या. मात्र खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पोलिसांचा तपासही तेवढ्याच वेगवान पद्धतीने होऊन सज्जड पुरावे जोडावे लागणार आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डाॅ. गुप्ता यांनी तपासासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. यात सायबर ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर, वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, हवालदार सुनील बडगुजर आणि वीरेश बने यांचा समावेश आहे. मुख्य तपासी अधिकारी म्हणून निरीक्षक आघाव काम करतील.

...अन् तपासी अधिकारी बदललेघटना घडल्याच्या दिवशी गुन्हे शाखेचे निरीक्षक आघाव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मूळ फिर्याद अधिक मजबूत करण्यासाठी टायपिस्टकडे बसून चुका दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र शेजारच्या केबिनमध्ये बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आपल्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी आघाव यांना स्वत:च्या केबिनमध्ये पोलिसांकरवी बोलावून घेतले. आघाव यांनी चुका दुरुस्त करीत असल्याचा निरोप दिल्यानंतरही बोलावणे थांबले नाही. त्यामुळे आघाव यांनी तेथून काढता पाय घेतला. आता आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासी अधिकारी बदलून आघाव यांच्याकडे तपास सोपवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद