शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडला मुसळधार

By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST

सिल्लोड : बैलपोळा फुटण्याच्या वेळेवर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास शहरास तालुक्यास धुवाधार पावसाने झोडपल्याने अनेक घरांत पाणी घुसले.

 

सिल्लोड : बैलपोळा फुटण्याच्या वेळेवर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास शहरास तालुक्यास धुवाधार पावसाने झोडपल्याने अनेक घरांत पाणी घुसले. तालुक्यात तर काही ठिकाणी ढगफुटी वाटावी असा पाऊस झाला. यामुळे भराडी, वांगी, मोढा, धानोरा, वांजोळा, अन्वी, पालोद, मंगरूळ, डोंगरगाव, वरुडसह परिसरातील अनेक गावांच्या शिवारात खरीप हंगामातील मका आडवा झाल्याने त्यापासून आता शेतकऱ्यांना काहीही आमदानी हाती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा पेरणीसाठी पावसाने केलेला उशीर व त्यानंतर पेरणी झाल्यावर दिलेला ताण शेतकऱ्यांना नाउमेद करणारा ठरला. त्यातून कसेबसे सावरत नाही तोच सोमवारी सायंकाळी अवकाळी स्वरूपाच्या या पावसाने शेतातील उभी पिके आडवी केली. पावसाने जीवदान दिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या आशा वाढल्या होत्या, त्या आशा आता मावळल्याचे चित्र दिसते आहे. याविषयीची माहिती मिळताच पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार, ज्येष्ठ नेते प्रभाकरराव पालोदकर यांनी अन्वी, पालोद परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ऐन पोळा फुटण्याच्या वेळेवर आलेल्या या पावसाने हा सण विस्कळीत झाला. पावसाचा जोर एवढा मोठा होता की, शहरातील स्नेहनगर, अब्दालशानगर, छत्तीस एकर परिसर, श्रीकृष्णनगर परिसर आदी अनेक ठिकाणी सखल भागातील घरात पाणी शिरले. त्यामुळे ऐन सणाच्या दिवशी घरातील पाणी काढण्याचे काम नागरिकांना करावे लागले. नगरसेवक अब्दुल समीर, राजरत्न निकम यांनी नागरिकांची भेट घेऊन दिलासा दिला. फुलंब्री : तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यात सुमारे २०० हेक्टर क्षेत्रातील मक्याचे पीक भुईसपाट झाले. पानवाडी या गावातील सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली होती. पीक चांगल्या स्थितीत असताना रविवारी व सोमवारी पडलेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. यात मका पीक भुईसपाट झाले. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मका पिकावरच भरवसा होता. अशात पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. फुलंब्री येथील आनंदा ढोके, जयपाल राजपूतसह स्थानिक शेतकऱ्यांचा मका जमीनदोस्त झाला आहे. ४करंजखेड : खरीप पिके करपली जात असताना मघा नक्षत्राने मात्र शेतकऱ्यास चांगलाच दिलासा दिला. २३, २४, २५ आॅगस्टला जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. २४-२५ आॅगस्टच्या पावसाने नदी-नाल्यांना प्रथमच पूर आला होता. सलग दोन वर्षांतील तीन हंगामातील संकटांच्या जणू मालिकाच शेतकऱ्यांभोवती येताना दिसतात. या अस्मानी संकटांच्या मालिकांनी त्यांना जेरीस आणल्याचे चित्र आहे. अशा संकटांनी शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आल्याचे दिसते. संकटे पिच्छा सोडायला तयार नाही. यामुळे निसर्गापुढे काय करावे, हा सवाल त्यांच्यासमोर आ वासून उभा ठाकला.